शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द!

By admin | Updated: December 24, 2014 02:21 IST

विशेष अधिवेशनासाठी सभागृहात आलेल्या राज्यपालांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावासाठी घेण्यात विशेष अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मंगळवारी रद्द करण्यात आले. विशेष अधिवेशनासाठी सभागृहात आलेल्या राज्यपालांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षाचे राहुल बोंद्रे (चिखली), अब्दूल सत्तार (सिल्लोड), अमर काळे (आर्वी), जयकुमार गोरे (माण) आणि विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) अशा पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित केले होते. आमदारांवरील निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर अधिवेशनात सरकारकडे मागणी लावून धरली होती. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे काही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मात्र सरकार योग्य संधीची वाट पाहात होते. आ. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या अशासकीय ठरावावरून फडणवीस सरकारला आयतीच संधी मिळाली. स्वतंत्र विदर्भाचा ठराव येणे भाजपासाठी अडचणीचे होते. तो मागे घ्या अशी त्यांची मागणी होती. ठराव मागे घ्यायचा असेल तर आमच्या सदस्यांचेही निलंबन मागे घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता. आ. वडेट्टीवार यांचा ठराव शुक्रवारी पुढे ढकलण्यात आला आणि हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आज मंगळवारी विधानसभेत केली. (विशेष प्रतिनिधी)