शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धाब्यावर बसविणारे निलंबित

By admin | Updated: January 15, 2016 01:37 IST

मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी

- यदु जोशी,  मुंबईमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी अशी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिणामी, गृहविभागातील कक्ष अधिकारी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याची बाब समोर आली होती. विधानसभेत या बाबत प्रचंड गदारोळ झाला होता. आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण होते. या घोटाळ्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी विशेष कृती दल (एसटीएफ) नेमण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने गृहविभागाला तसे लेखी कळविलेदेखील होते. प्रत्यक्षात वर्ष उलटले, तरी असे कृती दल नेमण्यातच आले नाही. उलट हा विषय गृहविभागातील कोणत्या उपसचिवांच्या कार्यकक्षेत येतो, यावर घोळ घालण्यात आला. त्यात काही महिने निघून गेले. नंतर वेगवेगळ्या विभागांकडून अभिप्राय मागविण्याचे सोपस्कार करण्यात वेळ घालविला. वर्षभरानंतर असे कृती दल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव कासवगतीने मुख्यमंत्र्यांसमोर आला. आपणच दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अशी अवस्था असल्याचे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्री संतप्त झाले व कृती दल तातडीने स्थापन करण्याबरोबरच या दिरंगाईला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. जीआरचा आढावा घेणारराज्य शासन एकामागे एक जीआर काढते, पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा आढावाच घेतला जात नाही. आता मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी असा आढावा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जीआरचा संबंधित वर्गाला कितपत फायदा झाला, याचे आॅडिटिंग होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांची नाराजीशासकीय योजना, निर्णयांची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. सरकारी अधिकारी ऐकत नाहीत, अशी भावना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी वेगवेगळे आदेश काढून नोकरशाही गतिमान करण्याचा निर्धार केला आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात गलथानपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.