शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धाब्यावर बसविणारे निलंबित

By admin | Updated: January 15, 2016 01:37 IST

मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी

- यदु जोशी,  मुंबईमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी अशी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिणामी, गृहविभागातील कक्ष अधिकारी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याची बाब समोर आली होती. विधानसभेत या बाबत प्रचंड गदारोळ झाला होता. आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण होते. या घोटाळ्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी विशेष कृती दल (एसटीएफ) नेमण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने गृहविभागाला तसे लेखी कळविलेदेखील होते. प्रत्यक्षात वर्ष उलटले, तरी असे कृती दल नेमण्यातच आले नाही. उलट हा विषय गृहविभागातील कोणत्या उपसचिवांच्या कार्यकक्षेत येतो, यावर घोळ घालण्यात आला. त्यात काही महिने निघून गेले. नंतर वेगवेगळ्या विभागांकडून अभिप्राय मागविण्याचे सोपस्कार करण्यात वेळ घालविला. वर्षभरानंतर असे कृती दल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव कासवगतीने मुख्यमंत्र्यांसमोर आला. आपणच दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अशी अवस्था असल्याचे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्री संतप्त झाले व कृती दल तातडीने स्थापन करण्याबरोबरच या दिरंगाईला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. जीआरचा आढावा घेणारराज्य शासन एकामागे एक जीआर काढते, पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा आढावाच घेतला जात नाही. आता मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी असा आढावा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जीआरचा संबंधित वर्गाला कितपत फायदा झाला, याचे आॅडिटिंग होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांची नाराजीशासकीय योजना, निर्णयांची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. सरकारी अधिकारी ऐकत नाहीत, अशी भावना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी वेगवेगळे आदेश काढून नोकरशाही गतिमान करण्याचा निर्धार केला आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात गलथानपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.