शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

‘उमवि’च्या कुलगुरुपदाचा ‘सस्पेन्स’

By admin | Updated: October 25, 2016 03:59 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती

- राहुल रनाळकर,  मुंबईउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती पार पडून देखील राजभवनातून सोमवारी, २४ आॅक्टोबर रोजी देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. राजभवनाच्या प्रोटोकॉलनुसार अंतिम पाच जणांच्या मुलाखती पार पडल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आत कुलगुरुंची निवड अधिकृतरित्या घोषित केली जाते. तथापि, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सध्या कमालीची लांबली आहे, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु निवड प्रक्रियेचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप आणि संघ परिवाराशी संबंधित सर्वच संघटनांनी प्रतिष्ठेचा केला आहे. संघ जरी प्रत्यक्ष कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामील होत नसला, तरी देखील चांगल्या लोकांची पारख करुन नाव सुचवण्यासाठी संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येते. एका शिस्तबद्ध आणि सचोटी असलेल्या व्यक्तीच्या नावावर एकमत होऊन ते नाव पुढे नेण्यात आले. तर विरोधी गटातील अर्थात माजी कुलगुरुंनीही त्यांच्या माणसांसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चांगलीच मोर्चेबांधणी केली. अखेर २० आॅक्टोबरला बहुप्रतिक्षित अंतिम मुलाखती पार पडल्या. संकेतानुसार अंतिम मुलाखती ही केवळ औपचारिकता असते. मुलाखतीनंतर केवळ घोषणा हीच महत्त्वाची बाब मानली जाते. सोमवारी दुपारी घोषणा होणारच असा कयास लावण्यात येत होता. तथापि संध्याकाळ होऊनही घोषणा न झाल्याने मोठा हिरमोड झाला.डॉ. पाटील नवे कुलगुरु? गुरुवार, २० आॅक्टोबरपासून कुलगुरुपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार याच्या तर्क वितर्कांना चांगलेच उधाण आले. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर डॉ. पी. पी. पाटील यांचे पारडे सगळ््यात जड आहे. तर त्यांना डॉ. ए. एम. महाजन यांचे आव्हान आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. पी. पी. पाटील यांची निवड राजभवनाने केलेली आहे. तथापि, काही ‘अनाकलनीय कारणे’ पुढे करुन ही घोषणा अद्याप झालेली नाही.