शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

दारू पिऊन वाहन चालविल्यास परवाना निलंबित

By admin | Updated: May 12, 2016 20:04 IST

मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12- आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत. परिवहन आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून, तीन महिन्यांपर्यंत दोषी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाही तर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलिसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये सामूहिकपणे वाहनचालक सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात.

गेल्या वर्षी वाहतुकीची पायमल्ली करणाऱ्या सुमारे १०८७ वाहनचालकांचा परवाना वाहतूक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाठविले. मात्र, यातील २९७ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणे व इतरांवर ६० दिवसांचे निलंबन करण्यात आले. असे असतानाही वाहतूक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. याची दखल परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतली. गंभीर वाहतूक गुन्ह्यासंदर्भात उदा. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लाल सिग्नल तोडणे आदी गुन्ह्यांसाठी वाहन चालविणाऱ्याचा वाहन परवाना कमीतकमी तीन महिने कालावधीसाठी निलंबित करण्याबाबत निर्देश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) दिले आहे.