शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:32 IST

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

- सतीश जोशीबीड - विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तर पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या या निवडणुकीची सुटका तब्बल अठरा दिवसानंतर म्हणजे १२ जून रोजी झाली. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील मतदारांचा समावेश असलेली ही निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत होती. भाजपाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी भाजपाला धक्का दिला, तर राष्टÑवादीतून निलंबित झालेले सुरेश धस यांना अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपाने उमेदवारी देऊन जशास तशी परतफेड केली. याच रमेश कराडानी शेवटच्या क्षणी माघार घेत राष्टÑवादीला गोत्यात आणले. रिंगणात उमेदवारच नसल्यामुळे राष्टÑवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देऊन नामुष्की टाळण्याचा केविलवाणी प्रयत्न केला.निवडणूक रिंगणात सुरेश धस आणि अशोक जगदाळे हे आमनेसामने असलेतरी प्रत्यक्षात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा-बहिणीत प्रतिष्ठेची लढत होती. दोघांनीही ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची बनवली होती. कागदावरील संख्याबळात विरोधकांचे पारडे अधिक जड असताना देखील केवळ डावपेचाच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सर्वांचेच सहकार्य घेऊन अशक्यप्राय वाटणारा विजय सुकर करून सुरेश धसांना विजयश्री मिळवून दिली.संख्याबळात आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे दोनशे मतांनी अधिक असतानाही ७४ मतांनी पराभूत झाले याचा अर्थच भाजपाने विरोधकाची जवळपास तिनशे मते सुरुंग लावून आपल्याकडे वळविली होती. दुसरीकडे जगदाळे यांच्या पराभवास बीड जिल्ह्यातील राष्टÑवादी अंतर्गतची गटबाजी देखील तेवढीच जबाबदार आहे.क्षीरसागरांची नाराजी भोवलीमाजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. परंतु, गटबाजीमुळे तेही दीड वर्षापासून पक्षापासून चार हात दूरच आहेत. या निवडणुकीत बीड पालिकेतील २७ आणि जिल्ह्यातील १८ असे जवळपास ४५ मतांचे गाठोडे त्यांच्या ताब्यात होते. इकडून तिकडून मते वळविण्याची या बंधूंची ताकद होती परंतु, ते अलिप्त राहिले. त्यांना या निवडणूक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. या अंतर्गत गटबाजीचा नेमका फायदा भाजपाने उचलला.अशी झाली मतांची फाटाफूटनिवडणुकीपूर्वी सुरेश धस यांच्याकडे ३८५ इतकीच मते असताना, त्यांनी ५२६ मते मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे (राष्ट्रवादी ३३६ अधिक काँग्रेसचे १९१) ५२७ मतांचे बळ असूनही त्यांना ४५२ मतं मिळाली. याचाच अर्थ धस यांनी विरोधकांची १४१ मते आपल्या पारड्यात वळविली.

टॅग्स :PoliticsराजकारणSuresh Dhasसुरेश धसBeedबीड