शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:32 IST

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

- सतीश जोशीबीड - विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तर पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या या निवडणुकीची सुटका तब्बल अठरा दिवसानंतर म्हणजे १२ जून रोजी झाली. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील मतदारांचा समावेश असलेली ही निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत होती. भाजपाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी भाजपाला धक्का दिला, तर राष्टÑवादीतून निलंबित झालेले सुरेश धस यांना अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपाने उमेदवारी देऊन जशास तशी परतफेड केली. याच रमेश कराडानी शेवटच्या क्षणी माघार घेत राष्टÑवादीला गोत्यात आणले. रिंगणात उमेदवारच नसल्यामुळे राष्टÑवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देऊन नामुष्की टाळण्याचा केविलवाणी प्रयत्न केला.निवडणूक रिंगणात सुरेश धस आणि अशोक जगदाळे हे आमनेसामने असलेतरी प्रत्यक्षात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा-बहिणीत प्रतिष्ठेची लढत होती. दोघांनीही ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची बनवली होती. कागदावरील संख्याबळात विरोधकांचे पारडे अधिक जड असताना देखील केवळ डावपेचाच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सर्वांचेच सहकार्य घेऊन अशक्यप्राय वाटणारा विजय सुकर करून सुरेश धसांना विजयश्री मिळवून दिली.संख्याबळात आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे दोनशे मतांनी अधिक असतानाही ७४ मतांनी पराभूत झाले याचा अर्थच भाजपाने विरोधकाची जवळपास तिनशे मते सुरुंग लावून आपल्याकडे वळविली होती. दुसरीकडे जगदाळे यांच्या पराभवास बीड जिल्ह्यातील राष्टÑवादी अंतर्गतची गटबाजी देखील तेवढीच जबाबदार आहे.क्षीरसागरांची नाराजी भोवलीमाजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. परंतु, गटबाजीमुळे तेही दीड वर्षापासून पक्षापासून चार हात दूरच आहेत. या निवडणुकीत बीड पालिकेतील २७ आणि जिल्ह्यातील १८ असे जवळपास ४५ मतांचे गाठोडे त्यांच्या ताब्यात होते. इकडून तिकडून मते वळविण्याची या बंधूंची ताकद होती परंतु, ते अलिप्त राहिले. त्यांना या निवडणूक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. या अंतर्गत गटबाजीचा नेमका फायदा भाजपाने उचलला.अशी झाली मतांची फाटाफूटनिवडणुकीपूर्वी सुरेश धस यांच्याकडे ३८५ इतकीच मते असताना, त्यांनी ५२६ मते मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे (राष्ट्रवादी ३३६ अधिक काँग्रेसचे १९१) ५२७ मतांचे बळ असूनही त्यांना ४५२ मतं मिळाली. याचाच अर्थ धस यांनी विरोधकांची १४१ मते आपल्या पारड्यात वळविली.

टॅग्स :PoliticsराजकारणSuresh Dhasसुरेश धसBeedबीड