शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:32 IST

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

- सतीश जोशीबीड - विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तर पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या या निवडणुकीची सुटका तब्बल अठरा दिवसानंतर म्हणजे १२ जून रोजी झाली. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील मतदारांचा समावेश असलेली ही निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत होती. भाजपाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी भाजपाला धक्का दिला, तर राष्टÑवादीतून निलंबित झालेले सुरेश धस यांना अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपाने उमेदवारी देऊन जशास तशी परतफेड केली. याच रमेश कराडानी शेवटच्या क्षणी माघार घेत राष्टÑवादीला गोत्यात आणले. रिंगणात उमेदवारच नसल्यामुळे राष्टÑवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देऊन नामुष्की टाळण्याचा केविलवाणी प्रयत्न केला.निवडणूक रिंगणात सुरेश धस आणि अशोक जगदाळे हे आमनेसामने असलेतरी प्रत्यक्षात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा-बहिणीत प्रतिष्ठेची लढत होती. दोघांनीही ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची बनवली होती. कागदावरील संख्याबळात विरोधकांचे पारडे अधिक जड असताना देखील केवळ डावपेचाच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सर्वांचेच सहकार्य घेऊन अशक्यप्राय वाटणारा विजय सुकर करून सुरेश धसांना विजयश्री मिळवून दिली.संख्याबळात आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे दोनशे मतांनी अधिक असतानाही ७४ मतांनी पराभूत झाले याचा अर्थच भाजपाने विरोधकाची जवळपास तिनशे मते सुरुंग लावून आपल्याकडे वळविली होती. दुसरीकडे जगदाळे यांच्या पराभवास बीड जिल्ह्यातील राष्टÑवादी अंतर्गतची गटबाजी देखील तेवढीच जबाबदार आहे.क्षीरसागरांची नाराजी भोवलीमाजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. परंतु, गटबाजीमुळे तेही दीड वर्षापासून पक्षापासून चार हात दूरच आहेत. या निवडणुकीत बीड पालिकेतील २७ आणि जिल्ह्यातील १८ असे जवळपास ४५ मतांचे गाठोडे त्यांच्या ताब्यात होते. इकडून तिकडून मते वळविण्याची या बंधूंची ताकद होती परंतु, ते अलिप्त राहिले. त्यांना या निवडणूक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. या अंतर्गत गटबाजीचा नेमका फायदा भाजपाने उचलला.अशी झाली मतांची फाटाफूटनिवडणुकीपूर्वी सुरेश धस यांच्याकडे ३८५ इतकीच मते असताना, त्यांनी ५२६ मते मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे (राष्ट्रवादी ३३६ अधिक काँग्रेसचे १९१) ५२७ मतांचे बळ असूनही त्यांना ४५२ मतं मिळाली. याचाच अर्थ धस यांनी विरोधकांची १४१ मते आपल्या पारड्यात वळविली.

टॅग्स :PoliticsराजकारणSuresh Dhasसुरेश धसBeedबीड