शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:42 IST

महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.२७) शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण केले. यावेळी कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. या टीकेवर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज सुप्रिया सुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील टीकेचा सवाल माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार अर्थातच पवार साहेबांवर…त्यांच स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय बातमी होत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, याच मोदी साहेबांच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याचीही आठवणही सुप्रिया सुळे यांनी करून दिली. तसेच, अगोदर पंतप्रधान राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे; ते यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे यावेळी त्यांचे आरोप बदलले, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना महायुती सरकारवर टीका केली. "मला वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे. सरकारला ४० दिवसांची डेडलाईन दिली होती. मला वाटलं यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी असेल. काहीतरी प्लान असेल. मग या ट्रिपल इंजिनच्या सरकारने ४० दिवसांचा मॅजिक नंबर आणला कुठून?, मग परत जरांगेंना आंदोलनाला बसावं लागलं म्हणजे आणखी एक ही जुमलेबाजी आहे", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत... कुठलाही समाज असू द्या, या सगळ्यांची आरक्षणाची मागणी आहे. सरकारने सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलवावं. त्यानंतर पाच-दहा दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यात चर्चा होऊ द्या अशी माझी मागणी आहे, असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत असेल, मग ते कुणाचेही सरकार असो, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी