शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बढतीमधील आरक्षणासाठी राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात : सामाजिक न्यायमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 20:56 IST

मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे.

अमरावती, दि. 25 -  मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाने पुढाकार घेतला असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने सन २००४ पासून अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गांना नोकरीतील बढतीत पदोन्नती आरक्षण लागू केले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मागासवर्गिय कर्मचाºयांना बढतीतील आरक्षण रद्द केले आहे. हा फटका राज्यसेवेतील ४९ विभागांतील सुमारे चार लाख कर्मचा-यांना बसणार आहे. ही बाब मागासवर्गिय कर्मचा-यांसाठी अन्यायकारक असल्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्ण घेण्यात आला आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. बढतीतील आरक्षण कायम राहावे, यासाठी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरिष साळवे यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे मागासवर्गिय कर्मचा-यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले जाईल, अशी माहिती आहे.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निणयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ती तत्वत: मान्य झाली आहे. दर महिन्याला समितीकडून आढावा घेतला जाईल.- राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार