शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सुप्रीम कोर्टाचे सर्वाधिक न्यायाधीश मूळचे मुंबईचे

By admin | Updated: November 14, 2016 05:48 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे,

अजित गोगटे / मुंबईसर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे, तसेच देशाच्या आत्तापर्यंत झालेल्या एकूण ४३ सरन्यायाधीशांपैकी सर्वाधिक सरन्यायाधीशही मुंबईनेच दिले आहेत.भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाल्यानंतर, दोन दिवसांनी दिल्लीतील टिळक मार्गावरील सध्याच्या वास्तूत सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू झाले. थेट वकिलांमधीन नेमल्या गेलेल्या काही न्यायाधीशांचा अपवाद वगळता, गेल्या ६६ वर्षांत सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीश देशभरातील २३ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना बढत्या देऊन नेमले गेले आहेत. सरन्यायाधीश न्यायाधीशांमधील सेवाज्येष्ठतेनुसार नेमले जातात. सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकांमध्ये विविध राज्ये, महिला अथवा मागासवर्गीय यांच्यासाठी कोणताही ‘कोटा’ नसला तरी शक्यतो प्रत्येक उच्च न्यायालयातून एक तरी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयावर यावा, असा प्रयत्न केला जातो.सर्वोच्च न्यायालयावर गेल्या ६६ वर्षांत झालेल्या न्यायाधीशांच्या नेमणुकांचे विविध निकषांवर विश्लेषण करणारा मुरली कृष्णन यांचा एक माहितीपूर्ण लेख ‘बार अ‍ॅण्ड बेंच’ या कायदेविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हे विश्लेषण करताना संबंधित न्यायाधीशाची सर्वप्रथम ज्या उच्च न्यायालयावर नेमणूक झाली ते त्याचे मूळ न्यायालय (पॅरेन्ट हायकोर्ट) असे मानून हे विश्लेषण करण्यात आले आहे. १९९३ मध्ये न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजियम’ची पद्धत लागू झाल्यानंतरच्या नेमणुका व त्याआधीच्या नेमणुका अशा दृष्टीनेही त्यात विश्लेषण केले गेले आहे.