शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचे सर्वाधिक न्यायाधीश मूळचे मुंबईचे

By admin | Updated: November 14, 2016 05:48 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे,

अजित गोगटे / मुंबईसर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे, तसेच देशाच्या आत्तापर्यंत झालेल्या एकूण ४३ सरन्यायाधीशांपैकी सर्वाधिक सरन्यायाधीशही मुंबईनेच दिले आहेत.भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाल्यानंतर, दोन दिवसांनी दिल्लीतील टिळक मार्गावरील सध्याच्या वास्तूत सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू झाले. थेट वकिलांमधीन नेमल्या गेलेल्या काही न्यायाधीशांचा अपवाद वगळता, गेल्या ६६ वर्षांत सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीश देशभरातील २३ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना बढत्या देऊन नेमले गेले आहेत. सरन्यायाधीश न्यायाधीशांमधील सेवाज्येष्ठतेनुसार नेमले जातात. सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकांमध्ये विविध राज्ये, महिला अथवा मागासवर्गीय यांच्यासाठी कोणताही ‘कोटा’ नसला तरी शक्यतो प्रत्येक उच्च न्यायालयातून एक तरी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयावर यावा, असा प्रयत्न केला जातो.सर्वोच्च न्यायालयावर गेल्या ६६ वर्षांत झालेल्या न्यायाधीशांच्या नेमणुकांचे विविध निकषांवर विश्लेषण करणारा मुरली कृष्णन यांचा एक माहितीपूर्ण लेख ‘बार अ‍ॅण्ड बेंच’ या कायदेविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हे विश्लेषण करताना संबंधित न्यायाधीशाची सर्वप्रथम ज्या उच्च न्यायालयावर नेमणूक झाली ते त्याचे मूळ न्यायालय (पॅरेन्ट हायकोर्ट) असे मानून हे विश्लेषण करण्यात आले आहे. १९९३ मध्ये न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजियम’ची पद्धत लागू झाल्यानंतरच्या नेमणुका व त्याआधीच्या नेमणुका अशा दृष्टीनेही त्यात विश्लेषण केले गेले आहे.