शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही?

By admin | Updated: August 25, 2016 06:11 IST

सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे

मुंबई : अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या विशेषाधिकारावर गंडांतर आणणारा आणि पोलिसांना अमर्याद अधिकार बहाल करणाऱ्या या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायदा हा आणीबाणीच्या काळातील मिसा कायद्याची आठवण करून देणारा असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षांनी चालविली आहे, तर या कायद्याच्या माध्यमातून कुठलाही दबाव जनतेवर आणण्याचा हेतूच नसल्याची भूमिका आज राज्य शासनाने स्पष्ट केली.प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर १९ आॅगस्ट रोजी टाकण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी आज आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन शासनाची बाजू मांडली. या मसुद्याचा अभ्यास न करताच, टीव्हीवरील चर्चांमधून त्यावर टीका केली जाते आणि अशी चर्चा निकोप नसते, असे बक्षी म्हणाले. हा मसुदा अधिकाऱ्यांच्या पातळीवर तयार करण्यात आला असून, तो अद्याप मुख्यमंत्री वा मंत्र्यांपर्यंत गेलेला नाही, असे सांगतानाच बक्षी यांनी, ‘या पुढे गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी कायद्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यानंतर तो वेबसाइटवर टाकण्यापूर्वी आम्ही प्रेससमोर जाऊ,’ असे सांगितले. ‘या मसुद्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यानंतरच अंतिम मसुदा होईल,’ असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>लग्न सोहळ्याला परवानगीलग्न, वाढदिवस, पूजा आदी कौटुंबिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठीदेखील यापुढे पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असे या मसुद्यात म्हटले आहे. के. पी. बक्षी यांनी याबाबत स्पष्ट केले की, खासगी जागेत हा समारंभ असेल, तर परवानगीची गरज नसेल. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असेल, तर परवानगी अनिवार्य असेल. >सात सदस्यीय समितीया कायद्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. गृहमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत गृह राज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयकुत आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सदस्य असतील. त्यात विरोधी पक्षाचा एकही सदस्य का नाही, या प्रश्नात बक्षी म्हणाले, अंतर्गत सुरक्षेच्या विषयात विरोधी पक्षाची व्यक्ती शासकीय समितीमध्ये नसते. >... केवळ १२० पोलीसराज्यात आज एक लाख नागरिकांच्या मागे केवळ १२० पोलीस कर्मचारी आहेत. एकीकडे नागरीकरण वाढत असताना पोलीस दलावरील ताण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, या सकारात्मक हेतूने हा कायदा आणला जात असल्याचे के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले. मकोका कायद्याला १९९९ मध्ये विरोध झाला होता, असेही ते म्हणाले. >राज्यातील युती सरकारने अंतर्गत सुरक्षेसंदर्भात मांडलेला नव्या विधेयकाचा मसुदा पूर्णत: असंवैधानिक असून या माध्यमातून राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.-राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते