शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पोषणयुक्त आहाराचा पुरवठा करा

By admin | Updated: July 20, 2016 01:33 IST

आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांची निवासी व्यवस्था करावी तसेच रिक्त असणारी सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत

घोडेगाव : आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांची निवासी व्यवस्था करावी तसेच रिक्त असणारी सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य इतर सुविधा गुणवत्तापुर्ण असाव्यात, त्यांना पोषणयुक्त व दर्जायुक्त आहाराचा पुरवठा केला जावा,आश्रमशाळांमध्ये सुरू असलेले भगवेकरणयुक्त कार्यक्रम थांबवावेत आदी ठराव आदिवासी आश्रमशाळा संवाद परिषदेत करण्यात आले.घोडेगाव येथे आदिवासी आश्रमशाळा कृती समिती पुणे जिल्हा यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. आदिवासींच्या शिक्षणात अत्यंत महत्वाची भुमिका बजाविणा-या आश्रमशाळेच्या प्रश्नांवर या परिषदेत सखोल चर्चा झाली. त्याचे उद्घाटन डॉ.दिलीप बांबळे यांनी केले. समारोपास जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य उपस्थित होते.या परिषदेत आश्रमशाळेच्या प्रश्नांसंबधीचे ठराव व कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. यामध्ये आहार पुरवण्यासाठी कायमस्वरूपी व पारदर्शक यंत्रणा असावी, आश्रमशाळेंचे दरवर्षी तज्ञ संस्थांमार्फत मुल्यमापन केले जावे, आश्रमशाळेतील संरक्षण व्यवस्था सक्षम करण्यात यावी, आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, इयत्ता ८ वी ते १० वी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांची सोय तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावी, आश्रमशाळांतील कंत्राटी कर्मचा-यांना तात्काळ सेवेत कायम करावे यांचा त्यात समावेश होता.पुणे जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेवर कविता वरे यांनी केलेल्या अभ्यासाच्या अहवालाचे प्रकाशान यावेळी डॉ.इंद्रजित जाधव, डॉ.बहुले सर, शरद जावळेकर, विजय आढारी, डॉ.पुरूषोत्तम काळे, बाळासाहेब कानडे, जी.डी.शिंदे इत्यादी उपस्थित होते. या अहवालावर परिषदेत सखोल चर्चा झाली. दुस-या सत्रात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी यांनी आश्रमशाळेंच्या प्रश्नांवर आपली मते मांडली.यावेळी शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे व पीएचडी मिळाल्याबद्दल हनुमंत भवारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू घोडे यांनी केले. ठरावाची मांडणी किरण लोहकरे यांनी केली. आभार अविनाश गवारी यांनी मानले.आश्रमशाळेतील निवासी शिक्षकांची उपलब्धता, आहार व शैक्षणिक साधनांची गुणवत्ता, शिक्षक भरती व प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची गळती, विद्यार्थ्यांसाठी संरक्षण व्यवस्था, कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न व इतर प्रश्वांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. समारोप सत्रासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत कुदळे हेही उपस्थित होते. आदिवासी आज, काल व उद्या या अमोल वाघमारे यांनी संपादीत केलेल्या पुस्तकाचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले. आश्रमशाळांमध्ये आदिवासी कांत्रीकारक, आदिवासी साहित्यिक यांचे समग्र साहित्य उपलब्ध करून दिले जावे, आश्रमशाळांना आदिवासी क्रांतीकारकांची नावे देण्यात यावीत असे ठराव करण्यात आले व या सर्व ठरावांची परिपूर्ती करण्यासाठी आदिवासी आश्रमशाळा हक्क संवाद परिषद एकजुटीने प्रकल्प अधिकारी यांच्याकडे प्रयत्न करतील असा निश्चय करण्यात आला.