शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

By admin | Updated: June 7, 2017 03:36 IST

ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे

सुरेश लोखंडे। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ताज्या भाजीपाल्यापासून वंचित राहावे लागले. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये १३ हजार ३३२ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजीपाल्याचा ट्रक भरून शेतमाल मंगळवारी पहाटे ४ वाजता धडकल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी शेतकऱ्यांनी राज्यभर बंद पाळलेला असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाणे, मुंबईकरांसाठी ताजा भाजीपाला मंगळवारी पहाटेच पोहोच झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या संपाची दाहकता आता कमी झाली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातून तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातूनदेखील भाजीपाला व अन्नधान्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे होलसेल मार्केटमधील माल सकाळीच किरकोळ बाजारपेठांमध्ये आल्यामुळे ठाणेकरांसह मुंबईकरांना बळीराजाने सुखद धक्का दिला. एमपीएमसी मार्केटसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड येथील होलसेल मार्केटमध्ये घेवडा, वांगी, टोमॅटो, वाटाणा, शिराळी, सुरण, शेवगा, गाजर, काकडी, बटाटा, कांदा, या भाज्यासह मेथी, पालक, मुळा, शेपू, कोथिंबीर, कांदापात, कडीपत्ता इत्यादी पालेभाज्या होलसेल बाजारभावाने विकला गेल्या. हाच भाजीपाला आजच्या किरकोळ बाजारपेठेत थोड्या चढ्या दराने म्हणजे ७० ते १२० रूपये किलोने ग्राहकांना विकण्यात आला. हा तर बुधवारी मात्र हे भाव खाली आलेले दिसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कल्याणच्या बाजारपेठेत ५३ ट्रक व ६५ टेम्पोव्दारे पाच हजार ९५३ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजापाला आला. राज्यातील १०१ आणि अन्य राज्यातील २८ ट्रक -टेम्पोतून हा शेतीमाल ठाणे , कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी आला आहे. कांदा-बटाटा १५७० क्विंटल, भाजीपाला २१५५, फळे ८८२ आणि ११३६ क्विंटल अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. भिवंडी मार्केटमध्ये २० टेम्पो, १० ट्रकदारे १०० टन भाजीपाला आला. मुरबाडला पाच टन भाजीपाला आणि २४ टन कांदा-बटाटा आला आहे. सरळगावच्या मंगळवारच्या बाजारात या मालाची उपलब्धता झाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.वाशीच्या एपीएमसीमध्ये १५७ गाड्यांव्दारे २,३३४ टन कांदा- बटाटा आला आहे. ३५४ गाड्यांनी २,५८० टन फळांची आवक झाली. ४२९ गाड्यांनी २४८० टन भाजी आणि २०२ गाड्यांनी ४७७८ मेट्रिक टन अन्नधान्याची आवक बाजारात झाली आहे. बुधवारनंतर राज्य व परराज्यातून अन्नधान्य व भाजीपाल्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. यामुळे भावाची घसरणही होईल. परंतु, मागील चार दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचा भाव मंगळवारी बाजारात कमी होता. किरकोळ व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा करून तो काही प्रमाणात चढ्या दराने विकला. मात्र, हे भावही लवकरच घसरण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.