शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

By admin | Updated: June 7, 2017 03:36 IST

ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे

सुरेश लोखंडे। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ताज्या भाजीपाल्यापासून वंचित राहावे लागले. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये १३ हजार ३३२ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजीपाल्याचा ट्रक भरून शेतमाल मंगळवारी पहाटे ४ वाजता धडकल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी शेतकऱ्यांनी राज्यभर बंद पाळलेला असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाणे, मुंबईकरांसाठी ताजा भाजीपाला मंगळवारी पहाटेच पोहोच झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या संपाची दाहकता आता कमी झाली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातून तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातूनदेखील भाजीपाला व अन्नधान्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे होलसेल मार्केटमधील माल सकाळीच किरकोळ बाजारपेठांमध्ये आल्यामुळे ठाणेकरांसह मुंबईकरांना बळीराजाने सुखद धक्का दिला. एमपीएमसी मार्केटसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड येथील होलसेल मार्केटमध्ये घेवडा, वांगी, टोमॅटो, वाटाणा, शिराळी, सुरण, शेवगा, गाजर, काकडी, बटाटा, कांदा, या भाज्यासह मेथी, पालक, मुळा, शेपू, कोथिंबीर, कांदापात, कडीपत्ता इत्यादी पालेभाज्या होलसेल बाजारभावाने विकला गेल्या. हाच भाजीपाला आजच्या किरकोळ बाजारपेठेत थोड्या चढ्या दराने म्हणजे ७० ते १२० रूपये किलोने ग्राहकांना विकण्यात आला. हा तर बुधवारी मात्र हे भाव खाली आलेले दिसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कल्याणच्या बाजारपेठेत ५३ ट्रक व ६५ टेम्पोव्दारे पाच हजार ९५३ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजापाला आला. राज्यातील १०१ आणि अन्य राज्यातील २८ ट्रक -टेम्पोतून हा शेतीमाल ठाणे , कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी आला आहे. कांदा-बटाटा १५७० क्विंटल, भाजीपाला २१५५, फळे ८८२ आणि ११३६ क्विंटल अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. भिवंडी मार्केटमध्ये २० टेम्पो, १० ट्रकदारे १०० टन भाजीपाला आला. मुरबाडला पाच टन भाजीपाला आणि २४ टन कांदा-बटाटा आला आहे. सरळगावच्या मंगळवारच्या बाजारात या मालाची उपलब्धता झाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.वाशीच्या एपीएमसीमध्ये १५७ गाड्यांव्दारे २,३३४ टन कांदा- बटाटा आला आहे. ३५४ गाड्यांनी २,५८० टन फळांची आवक झाली. ४२९ गाड्यांनी २४८० टन भाजी आणि २०२ गाड्यांनी ४७७८ मेट्रिक टन अन्नधान्याची आवक बाजारात झाली आहे. बुधवारनंतर राज्य व परराज्यातून अन्नधान्य व भाजीपाल्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. यामुळे भावाची घसरणही होईल. परंतु, मागील चार दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचा भाव मंगळवारी बाजारात कमी होता. किरकोळ व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा करून तो काही प्रमाणात चढ्या दराने विकला. मात्र, हे भावही लवकरच घसरण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.