शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:24 IST

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले.

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. या भागातील पूरही ओसरू लागला असला तरी त्याची गती संथ आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यही वेगाने सुरू आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे.ब्रह्मनाळ येथे गुरुवारी बोट बुडून जे वाहून गेले होते, त्यातील पाच जणांचे मृतदेह आज पूर ओसरू लागल्याने सापडले.कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वांगी २०० रुपये किलो, पालेभाज्या १२५ ते १६० रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी १०० रुपये भावाने विकली जात आहे. एटीएम बंद असल्याने खिशात रोकड नाही.शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकीत जास्तीतजास्त शंभर रुपयांचे पेट्रोल दिले जात होते. पंपावर लांबच लांब रांगा होत्या. पाच तासांच्या वाटपानंतर चौदा पंपांवरील पेट्रोल संपले.कोल्हापूरात ८४ रुपये किलो असलेली तूरडाळ १२५ रुपये किलो, १०० रुपयांच्या आसपास असलेला मसूर २०० रुपये, तर मटकी १६० रुपयांनी विकली जात आहे. सांगली जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. भाज्या अभावानेच मिळत आहेत. राज्याला दूधपुरवठा करणाऱ्या या पट्ट्यातच दूध मिळेनासे झाले आहे. त्यामुळे काही दूध संघ, स्थानिक संस्था व व्यक्तींना मोफत दूधपुरवठा केला.क-हाड, पाटणचा महापूर ओसरलासातारा जिल्ह्यातील पाटणसह क-हाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्री दरवाजे पाच फुटांवर आणण्यात आले. सध्या नदीपात्रात ४५ हजार २६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आवक ५१ हजार २६७ क्युसेकने सुरू आहे. पाणीसाठा १०२.८६ टीएमसी आहे.सांगलीत पूर ओसरतोय इंचाइंचानेसांगलीत अद्यापही ६० टक्के भाग पाण्याखाली असून, नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. पूर इंचाइंचाने ओसरत आहे. कोल्हापूर व सांगलीतील पूर पूर्णत: ओसरण्यास आणखी किमान ७२ तास लागतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, मात्र त्यावेळी रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पाऊ स पडता कामा नये.पूरग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई : मुख्यमंत्रीसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते म्हणाले की, अपंगत्व आल्यास पूर्वी ४३ हजार रुपये दिले जात, आता दोन लाख रुपये देण्यात येतील. उपचारासाठीसुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे. घर पडले तर पूर्वी ६० हजार रुपये भरपाई होती, आता एक लाख भरपाई मिळेल.जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची मदत केली जाईल. जेथे उद्योग, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतही मदतीचे धोरण स्वीकारले जाईल.शिरोळमध्ये पूरस्थिती गंभीरचशिरोळमधील १२ गावांना अजूनही पुराचा वेढा असून, त्यांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् येथून नौदलाचे एक पथक १२ बोटींसह येथे दाखल झाले. तालुक्यात शनिवारी पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे पोहोचती करण्यात आली. 

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर