शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:24 IST

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले.

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. या भागातील पूरही ओसरू लागला असला तरी त्याची गती संथ आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यही वेगाने सुरू आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे.ब्रह्मनाळ येथे गुरुवारी बोट बुडून जे वाहून गेले होते, त्यातील पाच जणांचे मृतदेह आज पूर ओसरू लागल्याने सापडले.कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वांगी २०० रुपये किलो, पालेभाज्या १२५ ते १६० रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी १०० रुपये भावाने विकली जात आहे. एटीएम बंद असल्याने खिशात रोकड नाही.शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकीत जास्तीतजास्त शंभर रुपयांचे पेट्रोल दिले जात होते. पंपावर लांबच लांब रांगा होत्या. पाच तासांच्या वाटपानंतर चौदा पंपांवरील पेट्रोल संपले.कोल्हापूरात ८४ रुपये किलो असलेली तूरडाळ १२५ रुपये किलो, १०० रुपयांच्या आसपास असलेला मसूर २०० रुपये, तर मटकी १६० रुपयांनी विकली जात आहे. सांगली जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. भाज्या अभावानेच मिळत आहेत. राज्याला दूधपुरवठा करणाऱ्या या पट्ट्यातच दूध मिळेनासे झाले आहे. त्यामुळे काही दूध संघ, स्थानिक संस्था व व्यक्तींना मोफत दूधपुरवठा केला.क-हाड, पाटणचा महापूर ओसरलासातारा जिल्ह्यातील पाटणसह क-हाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्री दरवाजे पाच फुटांवर आणण्यात आले. सध्या नदीपात्रात ४५ हजार २६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आवक ५१ हजार २६७ क्युसेकने सुरू आहे. पाणीसाठा १०२.८६ टीएमसी आहे.सांगलीत पूर ओसरतोय इंचाइंचानेसांगलीत अद्यापही ६० टक्के भाग पाण्याखाली असून, नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. पूर इंचाइंचाने ओसरत आहे. कोल्हापूर व सांगलीतील पूर पूर्णत: ओसरण्यास आणखी किमान ७२ तास लागतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, मात्र त्यावेळी रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पाऊ स पडता कामा नये.पूरग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई : मुख्यमंत्रीसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते म्हणाले की, अपंगत्व आल्यास पूर्वी ४३ हजार रुपये दिले जात, आता दोन लाख रुपये देण्यात येतील. उपचारासाठीसुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे. घर पडले तर पूर्वी ६० हजार रुपये भरपाई होती, आता एक लाख भरपाई मिळेल.जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची मदत केली जाईल. जेथे उद्योग, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतही मदतीचे धोरण स्वीकारले जाईल.शिरोळमध्ये पूरस्थिती गंभीरचशिरोळमधील १२ गावांना अजूनही पुराचा वेढा असून, त्यांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् येथून नौदलाचे एक पथक १२ बोटींसह येथे दाखल झाले. तालुक्यात शनिवारी पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे पोहोचती करण्यात आली. 

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर