शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

रविवार ठरला घातवार

By admin | Updated: May 16, 2016 04:57 IST

रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले.

मुंबई : रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले. तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यात अ‍ॅपे आॅटोला खडीने भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत नांदेडच्या १३ मजुरांसह १५ भाविक ठार व ३ जण गंभीर जखमी झाले़ तर, मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे शिवनेरी बस आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार तर चार जखमी झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील १८ मजूर आदिलाबादच्या निर्मलजवळील आडेली देवीच्या दर्शनाला आॅटोने जात असताना मध्यरात्री दहेगाव शिवारात समोरून येणाऱ्या टिप्परने (पान १० वर)(पान १ वरून) जोरदार धडक दिली़ त्यानंतर खडीने भरलेला हा टिप्पर उलटल्याने आॅटोचा चक्काचूरझाला. क्रेनच्या सहाय्यानेटिप्परला बाजूला करून मृतांना बाहेर काढले़यात गणपत आडेलू बाजेकर (५०), रतनबाई गणपत बाजेकर (४५), नरसिंग गणपत बाजेकर (३२), वंदना नरसिंग बाजेकर (३०), महानंदा दिलीप बाजेकर (२८), दीपा दिलीप बाजेकर (७), साई दिलीप बाजेकर (४),राजेश नरसिंग बाजेकर (२), शोभा राहुल बाजेकर (१९), प्रेम प्रल्हाद भालेराव (३), अर्चना सुरेश भालेराव (१०) ( सर्व जि़ नांदेड), प्रियंका गंगाधर दिवटेकर (१३) व आॅटोचालक बालू पोशट्टी संपागी (दोघेही तेलंगण), सुशीलाबाई बाबुराव गायकवाड (४५) व अर्जुन बाबुराव गायकवाड (११, दोघेही रा़ रामखडक, ता़उमरी, जि़नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर, राहुल गणपत बाजेकर (२२), दिलीप गणपत बाजेकर (३२), गंगाधर चन्ना ब्रम्हैया (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत़ लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठारराहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली़रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (४३), रचना जैन (४२), अर्चना शहा (४५, सर्व मध्य प्रदेश) व वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>शिवनेरी-कारचा अपघातमहाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे माणगाव तालुक्यातील रुद्रोली गावाजवळ पणजी-मुंबई शिवनेरी बस आणि एका मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांवर काळाने झडप घातली. डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय हे मंडणगड तालुक्यातील पेवे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोटारीतील संतोष तांबे (४३), स्वाती तांबे (३५), वृषभ तांबे (६), भिकूराम तांबे (७२) व प्रवीण पांडव (२९) मोटारचालक हे जागीच ठार झाले तर सूर्यकांत तांबे (४७), स्वप्निल तांबे (३५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.