शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवे शैक्षणिक वर्ष वेळेवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:34 IST

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे.

मुंबई/औरंगाबाद : एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकावरून शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालकांचा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने परीक्षा झाल्या नसतील अशाच शाळांनी एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवाव्यात, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या किवा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गदा न येता पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे. मात्र, या सूचनांमध्ये बरीच संदिग्धता असल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांकडून याला विरोध करण्यात आला. या सूचना कोणत्या मंडळासाठी लागू आहेत? ज्या शाळांच्या परीक्षा पार पडल्या आहेत, त्यांनी काय करावे? उन्हाचा तडाखा असणाऱ्या विदर्भ मराठवाड्यातील शाळांनी काय व्यवस्था करावी, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून याविरोधात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, हा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केवळ कोविड काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठीच हे निर्देश असल्याचे स्पष्टीकरण दिले. शिवाय मे महिन्यात शाळा सुरू ठेवाव्यात, असे कोणतेही निर्देश परिपत्रकात नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुट्ट्या कमी होणार नाहीत, असेही त्यांनी अधोरेखित केले. सुट्टीचा बेत रद्द करण्याची गरज नाही शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. -  अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक