शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अधिका-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:11 IST

वरिष्ठांकडून होत असलेले मानसिक अत्याचार, तसेच धमक्यांना कंटाळून दूरसंचार विभागातील सहायक महासंचालक संजीव राजोरिया (३७), यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची घटना

मुंबई : वरिष्ठांकडून होत असलेले मानसिक अत्याचार, तसेच धमक्यांना कंटाळून दूरसंचार विभागातील सहायक महासंचालक संजीव राजोरिया (३७), यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची घटना पवईत घडली. याप्रकरणी राजोरिया यांच्या पत्नीने वरिष्ठांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिस (आयईएस)मध्ये अधिकारी असलेले संजीव हे पवईच्या बीएसएनएल कॉलनीत पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचे. त्यांनी १२ वर्षे एमटीएनएलमध्ये नोकरी केली. गेल्या पाच वर्षांपासून ते दूरसंचार विभागात सहायक महासंचालक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास पवईच्या ओयो लॉजमध्ये त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ओयो लॉजच्या ११व्या मजल्यावरील खोली क्रमांक १०६मध्ये ते थांबले होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच, पवई पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली.पत्नी नीलम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, राजोरिया यांच्यावर त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठांकडून अत्याचार सुरू होता. कार्यालयातील एका महिला कर्मचाºयाचे लैंगिक शोषण करता यावे, यासाठी त्यांच्यावर दबाब आणला जात होता. त्यामुळे ते तणावाखाली होते. कार्यालयातील अधिकारी प्रिजेश कुमार, अरविंद कुमार, सुबोध सक्सेना आणि हौसला प्रसाद यांच्याविरुद्ध त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली होती. तरीदेखील दुर्लक्ष करण्यात आले. मानसिक तणावामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ते आठवडाभर सुटीवर होते. कामावर रुजू होऊन दोन दिवस होत नाही तोच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला कार्यालयातील वरिष्ठ जबाबदार असल्याने त्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नीलम यांनी केली आहे. या तक्रारीवरून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कुटुंबीयांनीही घेतली होती वरिष्ठांची भेट -राजोरिया यांना मार्च महिन्यांपासून वरिष्ठांनी टार्गेट केल्यानंतर त्यांनी याबाबत पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांच्या सासºयांनी विभागप्रमुखांची भेट घेऊन याकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. २१ जुलै रोजी यासंदर्भात त्यांची बैठक झाली. मात्र, काही तोडगा निघाला नाही. जर विभागप्रमुखांनी याची दखल घेतली असती तर ते वाचले असते, असे राजोरिया यांची पत्नी नीलम यांचे म्हणने आहे.