शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

५० टक्के सिंचन झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत- गडकरी

By admin | Updated: May 28, 2017 22:11 IST

विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 28 - विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत 50 टक्के सिंचन क्षमतेचा विकास होत नाही, तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र शासनाला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने जलसंवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले आहे आणि यामुळे भूजल पातळीदेखील वाढत आहे. मात्र सिंचन क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतक-यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता विदर्भात विविध योजना आणण्यात येत आहे. विदर्भात दूध उत्पादन वाढावे व यातून शेतक-यांचा फायदा व्हावा यासाठी विशेष प्रकल्प सुरू होणार आहे. याची जबाबदारी ‘एनडीडीबी’ला (नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड) देण्यात आली असून २५ लाख लीटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेत विदर्भातील ७ तर मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील ३ ते ५ लाख शेतकºयांना लाभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले. नागपूर मनपाने ‘एनडीडीबी’ला शहरातील ४० ठिकाणांवर दूध विकण्याची परवानगी दिली आहे. ४ जून रोजी नागपुरात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.गडचिरोलीत अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू झाले असून यामुळे ५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच गडचिरोली व वर्धा येथून मध गोळा करून त्याची आयात करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाला वाढविण्यासाठीदेखील योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना जोडधंदा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.