शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

५० टक्के सिंचन झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत- गडकरी

By admin | Updated: May 28, 2017 22:11 IST

विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 28 - विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत 50 टक्के सिंचन क्षमतेचा विकास होत नाही, तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र शासनाला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने जलसंवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले आहे आणि यामुळे भूजल पातळीदेखील वाढत आहे. मात्र सिंचन क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतक-यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता विदर्भात विविध योजना आणण्यात येत आहे. विदर्भात दूध उत्पादन वाढावे व यातून शेतक-यांचा फायदा व्हावा यासाठी विशेष प्रकल्प सुरू होणार आहे. याची जबाबदारी ‘एनडीडीबी’ला (नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड) देण्यात आली असून २५ लाख लीटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेत विदर्भातील ७ तर मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील ३ ते ५ लाख शेतकºयांना लाभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले. नागपूर मनपाने ‘एनडीडीबी’ला शहरातील ४० ठिकाणांवर दूध विकण्याची परवानगी दिली आहे. ४ जून रोजी नागपुरात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.गडचिरोलीत अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू झाले असून यामुळे ५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच गडचिरोली व वर्धा येथून मध गोळा करून त्याची आयात करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाला वाढविण्यासाठीदेखील योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना जोडधंदा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.