शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मुलगा आणि भावाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 05:25 IST

कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या युवा मोर्चाचे पालघर-ठाणे जिल्हा सरचिटणीस अरुण सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवून एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी गु्न्हा दाखल करून महिला पत्रकार ज्योती तिवारी, तिचे वडिल लक्ष्मीकांत तिवारी, रोहित कोनारी यांना ७ जून २०१७ ला अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणात आपला कोणताही सहभाग नसताना विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक डोईफोडे, हवालदार गांगुर्डे यांच्यासह सात-आठ पोलीस साध्या वेषात १५ जूनच्या पहाटे दोन वाजता दरवाजा तोडून आपल्या घरात घुसले. घरात असलेल्या सीसीटीव्ही डिव्हीडी तोडून टाकला. त्यानंतर मुलगा अनुज सिंग (१८) आणि भाऊ अजित सिंग (३२) यांना बेकायदेशीरपणे विरार पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये टाकले. त्याठिकाणी दोघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कळल्यानंतर पोलीस तिवारीप्रकरणात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती असल्याने आपण वसई कोर्टातून १५ जूनला अटकपूर्व जामीन घेतला. ही माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी मुलगा आणि भावाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडून दिले. असा आरोप अरुण सिंग यांनी केला आहे. पोलिसांवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तक्रार आली असेल तर त्याची शहानिशा केली जाईल, असे डिवायएसपी जयंत बजबळे यांनी सांगितले.