शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:30 IST

महाराष्ट्र व्यापारी परिषदेत ग्वाही 

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्लास्टिकचे दुष्परिणामही आहेत. त्याच्या वापराने कॅन्सर  होत आहेत. शेवटी सरकार सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच निर्णय घेत असते. मात्र,  प्लास्टिकला पर्याय काय, ते व्यापारी, उद्योजकांनी  सुचवावे. अन्नधान्यावरील जीएसटी व अन्य प्रश्नांवर लवकरच व्यापाऱ्यांची मुंबईत बैठक घेऊ. त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, आम्हाला कोणाला बेरोजगार करायचे नाही, कोणाचे व्यवसाय बंद पाडायचे नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिला. 

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री् व जिल्हा व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘महाराष्ट्र व्यापारी परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न सकारात्मक विचारातून सोडविण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, आ. संदीपान भुमरे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, तनसुख झांबड, आदेशपालसिंग छाबडा, सत्यनारायण लाहोटी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, उद्योजक घनश्याम गोयल होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील व्यापार, उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे व त्याला चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल. महाराष्ट्र चेंबरने कृषीपूरक उद्योगांच्या विकासासाठी, तसेच राज्यात गुंतवणूक वाढीसाठीही प्रयत्न करावे. महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या कौशल्य विकासाच्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल.  

राजकीय बंदमध्ये व्यापारी नसतील  nमहाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने बंदचे आवाहन केले, तर त्यात व्यापारी सहभागी होणार नाहीत. व्यापाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली, तर बंद न पाळता वेगळ्या मार्गाने प्रश्न सोडविणार. nअन्नधान्यावरील जीएसटी निर्णय मागे न घेतल्यास मुंबईत ५० हजार व्यापारी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPlastic banप्लॅस्टिक बंदी