शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

साखरेचा भाव गाठणार पन्नाशी

By admin | Updated: April 20, 2016 06:01 IST

देशात डाळींचे भाव कडाडण्याची स्पष्ट चिन्हे असताना आता साखरेचाही गोडवा कमी होण्याची भीती आहे. भारताच्या साखर उत्पादनात यंदा मोठी घट असून

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली देशात डाळींचे भाव कडाडण्याची स्पष्ट चिन्हे असताना आता साखरेचाही गोडवा कमी होण्याची भीती आहे. भारताच्या साखर उत्पादनात यंदा मोठी घट असून, त्यामुळे साखरेचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या साखर साधारणत: ४0 रुपये किलोने मिळत असून, महिनाभरात हा भाव सरासरी १० रुपयांनी वाढेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदाच्या एफआरपीनुसार ऊस उत्पादकाला साधारणत: २००० ते २४00 रुपये प्रति टन भाव मिळाला. ग्राहकांना सध्या ४0 रुपये किलोने साखर मिळते आहे. कमी उत्पादनामुळे साखरेचे भाव वाढल्यास त्यास सरकारचे धरसोडीचे धोरण जबाबदार असेल, अशी टीका लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखाना परिवारातील ५ साखर कारखान्यांचे संचालन करणारे आमदार अमित देशमुख यांनी केली. भारतात दरवर्षी साखरेचा खप २२५ लाख टन असला तरी त्यातली ७0 ते ८0 टक्के साखर आइसक्रीम, चॉकलेट्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स कारखान्यांमध्ये वापरली जाते. ग्राहकांच्या थेट वापराचे साखरेचे प्रमाण २0 ते ३0 टक्के आहे. ही तफावत लक्षात घेता सरकारने कारखान्यांना त्याचा भार उचलावयास भाग पाडले पाहिजे, अशी मागणीही आ. देशमुख यांनी केली. राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने साखरेसाठी स्टॉक लिमिट ठरवले होते. आता साखरेवरील स्टॉक लिमिट सरकारने काढून टाकले असल्याने साठेबाजीवर नियंत्रण कसे घालणार, हा मोठा प्रश्न आहे.