शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

साखर कारखाने, संस्था काढून स्वत:ची घरे भरायची नाहीत- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:54 IST

साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला.

इस्लामपूर (जि. सांगली) : साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला. काँग्रेस आघाडीने सत्तेत असताना १0 वर्षे स्वामिनाथन् आयोग का गुंडाळून ठेवला होता, असा सवालही त्यांनी केला.इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकळा, अवर्षण आणि पिकलेच, तर बाजारभाव कोसळतो. अशा तिहेरी संकटात शेतकरी नेहमी सापडत आला आहे. मात्र आमचे सरकार याबाबत गंभीर आहे.पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत पाणी योजनांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे.युती सरकारच्या काळात सांगली जिल्ह्यात पूर्णत्वाकडे आलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांची कामे आघाडी सरकारने १५ वर्षांत पूर्ण केली नाहीत. आम्ही या योजना पूर्ण करून ५0 हजार एकर जमीन ओलिताखाली आणणार आहोत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस