शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

साखर कारखाने, संस्था काढून स्वत:ची घरे भरायची नाहीत- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:54 IST

साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला.

इस्लामपूर (जि. सांगली) : साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला. काँग्रेस आघाडीने सत्तेत असताना १0 वर्षे स्वामिनाथन् आयोग का गुंडाळून ठेवला होता, असा सवालही त्यांनी केला.इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकळा, अवर्षण आणि पिकलेच, तर बाजारभाव कोसळतो. अशा तिहेरी संकटात शेतकरी नेहमी सापडत आला आहे. मात्र आमचे सरकार याबाबत गंभीर आहे.पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत पाणी योजनांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे.युती सरकारच्या काळात सांगली जिल्ह्यात पूर्णत्वाकडे आलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांची कामे आघाडी सरकारने १५ वर्षांत पूर्ण केली नाहीत. आम्ही या योजना पूर्ण करून ५0 हजार एकर जमीन ओलिताखाली आणणार आहोत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस