शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नापास झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या : नैराश्य टाळा

By admin | Updated: June 14, 2017 13:47 IST

परिक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील सिध्दपिंप्री गावातील एका विद्यार्थ्याने आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.

नाशिक : दहावीच्या शालांत परिक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील सिध्दपिंप्री गावातील एका विद्यार्थ्याने आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह गावाच्या शिवारातील एका विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दहावीच्या परिक्षेच्या निकालाचा कुठलाही तणाव व नैराश्य विद्यार्थ्यांनी बाळगू नये, असे थेट आवाहन नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने, सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी यांनी केले आहे. दहावीच्या परिक्षेत जरी एक किंवा दोन विषयांत विद्यार्थी नापास जरी झाला असला तरी त्याला जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा देऊन उत्तीर्ण होता येते. तसेच परिक्षेपुर्वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीलादेखील प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनावर कुठलाही ताण न घेता भीती न बाळगता जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करावी. संजय केदू कराटे (१६) हा मंगळवारी दुपारी खेळत होता. मात्र जेव्हा त्याला दहावीचा निकाल समजला तेव्हा त्याने नैराश्यात येऊन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत जाऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. दिवसभर संजय घरी परतला नाही त्यामुळे संध्याकाळनंतर त्याच्या नातेवाईकांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.