शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सुधीर तांबे यांच्यावर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: March 26, 2016 01:11 IST

संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे

पुणे : संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे डॉ. जयसिंग शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापिका विजया देशमुख यांचा १९९१ साली भाजून मृत्यू झाला होता. रहात्या घरी ३५ भाजलेल्या देशमुख यांना डॉ. तांबे यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्टोव्हच्या भडक्यामुळे आपण भाजलो असून कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे विजया देशमुख यांनी म्हटले होते.फरासखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन या गुन्ह्याची कागदपत्रे संगमनेर पोलिसांकडे पाठवून दिली होती. त्यानंतर १९९४-९५ च्या काळात देशमुख यांच्या नातेवाईकांनी डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विजया यांचा मृत्यू झाल्याची जनहित याचिका दाखल करीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या याचिकेवर निर्णय होण्याआधीच ती मागेही घेण्यात आली. दरम्यान, २००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते हेमंत यशवंत ढगे (वय ३४, रा. हडपसर) यांनी उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात पुन्हा जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी फरासखाना पोलिसांना १९ मार्च रोजी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी कलम भा.द.वि. ३०२, २०१,३४ (खून, पुरावा नष्ट करणे आणि संगनमत) या कलमान्वये डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ढगे यांनाच फिर्यादी केले आहे. माजी मंत्री थोरात यांचे म्हणणे-हेमंत ढगे यांनी केवळ ऐकिव माहितीवर ही खासगी फिर्याद दाखल केली असून त्यात काहीही तथ्य नाही. सदर महिलेच्या मृत्युची संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यू म्हणून नोंद असून उपविभागीय दंडाधिकारी यांनीदेखील सदर मृत्यू अपघाती मृत्यू असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी केसची चौकशी करून कोर्टास अहवाल सादर केलेला आहे, असा खुलासा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत थोरात यांनी सांगितले की, पहिली चौकशी पुर्णत: ग्राह्य धरून सहा महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून तांत्रिकदृष्टया एफआयआर दाखल करावा व तसा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे सुप्रिम कोर्टाच्या आदेशात म्हटले असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे.सदर प्रकरणाच्या पाठिमागे अहमदनगर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याचा हात असून पक्षातील सहकाऱ्याची समाजातील प्रतिमा डागाळण्याचा व राजकीय स्पर्धेतून त्यांना दूर करण्याचा त्यांचा हेतू आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे. मात्र, तो नेता कोण, याचा नमोल्लेख त्यांनी टाळला आहे.काय आहे फिर्याद?डॉ. सुधीर तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत. ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब थोरात आणि प्रा. विजया देशमुख यांचे संबंध होते. थोरात यांना मुलगा होत नसल्यामुळे देशमुख यांच्याशी त्यांनी संबंध ठेवलेले होते. मात्र, पत्नीपासून मुलगा झाल्यानंतर त्यांनी विजया देशमुख यांच्यासोबत असलेले संबंध तोडले. थोरात हे एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असल्याने भाजलेल्या प्रा. देशमुख यांना जाणीवपूर्वक डॉ. तांबे यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले. तेथून पुण्याला डॉ. जयसिंग शिंदे यांच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. काही दिवसांनी उपचार बंद करण्यात आल्यामुळे देशमुख यांचा मृत्यू झाला, असा आरोप ढगे यांनी फिर्यादीमध्ये केला आहे.