शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर तांबे यांच्यावर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: March 26, 2016 01:11 IST

संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे

पुणे : संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे डॉ. जयसिंग शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापिका विजया देशमुख यांचा १९९१ साली भाजून मृत्यू झाला होता. रहात्या घरी ३५ भाजलेल्या देशमुख यांना डॉ. तांबे यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्टोव्हच्या भडक्यामुळे आपण भाजलो असून कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे विजया देशमुख यांनी म्हटले होते.फरासखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन या गुन्ह्याची कागदपत्रे संगमनेर पोलिसांकडे पाठवून दिली होती. त्यानंतर १९९४-९५ च्या काळात देशमुख यांच्या नातेवाईकांनी डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विजया यांचा मृत्यू झाल्याची जनहित याचिका दाखल करीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या याचिकेवर निर्णय होण्याआधीच ती मागेही घेण्यात आली. दरम्यान, २००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते हेमंत यशवंत ढगे (वय ३४, रा. हडपसर) यांनी उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात पुन्हा जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी फरासखाना पोलिसांना १९ मार्च रोजी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी कलम भा.द.वि. ३०२, २०१,३४ (खून, पुरावा नष्ट करणे आणि संगनमत) या कलमान्वये डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ढगे यांनाच फिर्यादी केले आहे. माजी मंत्री थोरात यांचे म्हणणे-हेमंत ढगे यांनी केवळ ऐकिव माहितीवर ही खासगी फिर्याद दाखल केली असून त्यात काहीही तथ्य नाही. सदर महिलेच्या मृत्युची संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यू म्हणून नोंद असून उपविभागीय दंडाधिकारी यांनीदेखील सदर मृत्यू अपघाती मृत्यू असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी केसची चौकशी करून कोर्टास अहवाल सादर केलेला आहे, असा खुलासा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत थोरात यांनी सांगितले की, पहिली चौकशी पुर्णत: ग्राह्य धरून सहा महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून तांत्रिकदृष्टया एफआयआर दाखल करावा व तसा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे सुप्रिम कोर्टाच्या आदेशात म्हटले असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे.सदर प्रकरणाच्या पाठिमागे अहमदनगर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याचा हात असून पक्षातील सहकाऱ्याची समाजातील प्रतिमा डागाळण्याचा व राजकीय स्पर्धेतून त्यांना दूर करण्याचा त्यांचा हेतू आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे. मात्र, तो नेता कोण, याचा नमोल्लेख त्यांनी टाळला आहे.काय आहे फिर्याद?डॉ. सुधीर तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत. ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब थोरात आणि प्रा. विजया देशमुख यांचे संबंध होते. थोरात यांना मुलगा होत नसल्यामुळे देशमुख यांच्याशी त्यांनी संबंध ठेवलेले होते. मात्र, पत्नीपासून मुलगा झाल्यानंतर त्यांनी विजया देशमुख यांच्यासोबत असलेले संबंध तोडले. थोरात हे एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असल्याने भाजलेल्या प्रा. देशमुख यांना जाणीवपूर्वक डॉ. तांबे यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले. तेथून पुण्याला डॉ. जयसिंग शिंदे यांच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. काही दिवसांनी उपचार बंद करण्यात आल्यामुळे देशमुख यांचा मृत्यू झाला, असा आरोप ढगे यांनी फिर्यादीमध्ये केला आहे.