शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जुनी फौजदारी अपिले निकाली काढण्याची योजना सादर करा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टास आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:42 IST

या अपिलांपैकी ८,४७४ अपिले १० ते २० वर्षे, ८३८ अपिले २० ते ३० वर्षे तर आठ अपिले ३० वर्षांहूनही अधिक काळ प्रलंबित आहेत.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात ९,३२० फौजदारी अपिले १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत याची गंभीर दखल घेत ही अपिले लवकर निकाली काढण्याची निश्चित योजना सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या अपिलांपैकी ८,४७४ अपिले १० ते २० वर्षे, ८३८ अपिले २० ते ३० वर्षे तर आठ अपिले ३० वर्षांहूनही अधिक काळ प्रलंबित आहेत.खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या उत्तर प्रदेशातील एका कैद्याने त्याचे अपील लवकर सुनावणीस येत नसल्याने जामीन मिळावा यासाठी केलेल्या याचिकेच्या निमित्ताने न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सर्वाधिक जुनी फौजदारी अपिले प्रदीर्घ असलेल्या मुंबईसह सात उच्च न्यायालयांचा विषय हाती घेत हा आदेश दिला.खंडपीठाने म्हटले की, अपिले अशा प्रकारे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहणे हे एक प्रकारे न्यायप्रक्रियेसच आव्हान आहे. खटल्ला लवकरता लवकर निघाली निघणे हा प्रत्येक गुन्हेगाराचा हक्क आहे व यात अपिलांचाही समावेश आहे. अपिलेच वाजवी काळात निकाली निघणार नसतील तर कायद्याने अपिल करण्याचा दिलेला अधिकारच मुळात निव्वळ भ्रामक ठरेल. यामुळे अपिलाचा निकाल होईपर्यंत मूळ शिक्षेचा बव्हंशी भाग भोगून झालेला असतो व अशा वेळी आरोपी जामिनावर नसेल तर अपिलात निर्दोश ठरूनही त्याला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागतो.>विशेष खंडपीठे नेमा!जुनी अपिले लवकर निकाली काढण्यासाठी विशेष खंडपीठे नेमणे किंवा प्रत्येक खंडपीठास नेहमीच्या इतर कामांखेरीज अशी अपिले सुनावणीसाठी वाटून देणे याखेरीज इतर उपायांचा न्यायालयांनी विचार करावा, असेही खंडपीठाने म्हटले.