शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जुनी फौजदारी अपिले निकाली काढण्याची योजना सादर करा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टास आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:42 IST

या अपिलांपैकी ८,४७४ अपिले १० ते २० वर्षे, ८३८ अपिले २० ते ३० वर्षे तर आठ अपिले ३० वर्षांहूनही अधिक काळ प्रलंबित आहेत.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात ९,३२० फौजदारी अपिले १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत याची गंभीर दखल घेत ही अपिले लवकर निकाली काढण्याची निश्चित योजना सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या अपिलांपैकी ८,४७४ अपिले १० ते २० वर्षे, ८३८ अपिले २० ते ३० वर्षे तर आठ अपिले ३० वर्षांहूनही अधिक काळ प्रलंबित आहेत.खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या उत्तर प्रदेशातील एका कैद्याने त्याचे अपील लवकर सुनावणीस येत नसल्याने जामीन मिळावा यासाठी केलेल्या याचिकेच्या निमित्ताने न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सर्वाधिक जुनी फौजदारी अपिले प्रदीर्घ असलेल्या मुंबईसह सात उच्च न्यायालयांचा विषय हाती घेत हा आदेश दिला.खंडपीठाने म्हटले की, अपिले अशा प्रकारे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहणे हे एक प्रकारे न्यायप्रक्रियेसच आव्हान आहे. खटल्ला लवकरता लवकर निघाली निघणे हा प्रत्येक गुन्हेगाराचा हक्क आहे व यात अपिलांचाही समावेश आहे. अपिलेच वाजवी काळात निकाली निघणार नसतील तर कायद्याने अपिल करण्याचा दिलेला अधिकारच मुळात निव्वळ भ्रामक ठरेल. यामुळे अपिलाचा निकाल होईपर्यंत मूळ शिक्षेचा बव्हंशी भाग भोगून झालेला असतो व अशा वेळी आरोपी जामिनावर नसेल तर अपिलात निर्दोश ठरूनही त्याला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागतो.>विशेष खंडपीठे नेमा!जुनी अपिले लवकर निकाली काढण्यासाठी विशेष खंडपीठे नेमणे किंवा प्रत्येक खंडपीठास नेहमीच्या इतर कामांखेरीज अशी अपिले सुनावणीसाठी वाटून देणे याखेरीज इतर उपायांचा न्यायालयांनी विचार करावा, असेही खंडपीठाने म्हटले.