शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By admin | Updated: June 9, 2016 01:19 IST

राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविले

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत राबविल्या जाणा-या ‘आव्हान’ या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आपत्ती व्यवस्थापन शिबिरामध्ये राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविले. देहूगाव येथील नदीच्या पात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याचे प्रशिक्षण घेतले. तसेच विद्यापीठाच्या आवारात बॉम्बस्फोट किंवा आग लागल्यामुळे इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना कसे वाचवावे याबाबतचे प्रशिक्षण घेतले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘आव्हान’ मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निवडलेले १ हजार १२२ महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यात ७३१ विद्यार्थी व ३६४ विद्यार्थीनी आणि ६४ कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश आहे. मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी घ्यावयाची काळजी, त्यासाठी करावयाच्या इतर उपाययोजना याबाबत प्रशासकीय, वैद्यकीय मदत, तत्सम कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. देहूगाव येथील नदी पात्राजवळ विद्यार्थ्यांना बोटी तयार करणे, तराफा तयार करणे, पोहता येत असताना वाचविणे किंवा न येत असताना बुडणा-याला कसे वाचवावे याचे प्रशिक्षण दिले.तसेच लाइफ जॅकेट तयार करण्याचे, थर्माकोलपासून लाइफ जॅकेट बनविण्याचे, पाण्यावर कसे तरंगता येईल याबाबतची माहिती दिली. (प्रतिनिधी)>चित्तथरारक प्रशिक्षणविद्यापीठाच्या आठ क्रमांच्या वसतीगृहाच्या इमारतीजवळ एनडीआरएफचे जवान सुनील तिवारी, बी.के.सिंग यांनी विद्यार्थ्यांना भिंतीवरून चढण्याचे व उतरण्याचे तसेच इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे प्रशिक्षण दिले.एखाद्या सिनेमात पहावी अशी चित्तथरारक दृश्ये पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.संजयकुमार दळवी उपस्थित होते.