शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

विद्यार्थ्यांनो यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा

By admin | Updated: August 4, 2016 21:27 IST

सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला

परिमल व्यास : एम. एस. विद्यापीठच्या कुलगुरुंचा सल्लामुंबई, दि. ४ : सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला महाराज सयाजी विद्यापीठ बडोदाचे कुलगुरु प्राध्यापक परिमल व्यास यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.

बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि शेठ कानजी व्ही. पारेख कनिष्ठ महाविद्यालयाचा ३७ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यास यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. बी. पंडित, उपाध्यक्ष डॉ. आर. जे. गुजराथी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही. संत, उपप्राचार्य डॉ. एन. बी. आचार्य, उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे, उपप्राचार्य एस. एच. अत्रावलकर आणि निरिक्षक प्रा. एम. एम. बुधकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आपण अनेकदा विविध समस्यांचा सामना करतो. परंतु, आपला अधिक वेळ त्यावर चर्चा करण्यात वाया जातो. तेव्हा चर्चा थांबवून उपाय शोधून लगेच कार्य करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. जागतिकिकरणामुळे आज तंत्रज्ञानाचा सगळीकडे वापर होत असून यामध्ये आपण अधिक लक्ष शहरी भागाकडे देत आहोत. देशाचे महान राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी यापुर्वीच ग्रामीण व शहरी भागाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपययोजनांची माहिती आपल्याला दिली असून त्यानुसार आज काम करण्याची गरज आहे, असेही व्यास यांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे डॉ. गुजराथी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगातील आव्हाने आणि जागतिकिकरणा यावर सहजसोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा. पंडित यांनी सध्याच्या युवा भारत देशावर प्रकाश टाकताना युवकांपुढे उभ्या असलेल्या विविध संधी यावर भाष्य केले.

दरम्यान, यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेचर क्लबचे निर्झरा आणि वाड्:मय सभाचे कस्तुरी या हस्तलिखितांचे प्रकाशन झाले. तसेच यावेळी विविध प्राध्यपक व तज्ञ्जांनी लेख लिहिलेल्या ह्यदी क्वेस्टह्ण या अर्थविश्वावरील पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रा. कल्पना गावडे, प्रा. प्राची कदम आणि आशा पट्टे या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार यावेळी झाला