शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

विद्यार्थ्यावर महिलेचे लैंगिक अत्याचार !

By admin | Updated: April 1, 2015 04:24 IST

शीतपेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळून एका ४० वर्षीय महिलेने दहावीतल्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. इतक्यावरच न थांबता या महिलेने

समीर कर्णुक , मुंबईशीतपेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळून एका ४० वर्षीय महिलेने दहावीतल्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. इतक्यावरच न थांबता या महिलेने ते क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. त्या जोरावर तिने शारीरिक मुलावर अत्याचार सुरूच ठेवले. तुझ्यासकट कुटुंबाला संपवेन, अशी धमकी देत या महिलेने त्या कोवळ््या मुलासोबत नवी मुंबईतल्या एका मंदिरात लग्नही केले. हा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला. महिलेच्या अत्याचारापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्याने तक्रार देऊन तीन दिवस लोटले, तरी अद्याप चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदविलेला नाही. चौकशी करू आणि मग कारवाई करू, असे सांगून पोलिसांनी या विद्यार्थ्याची व त्याला पोलीस ठाण्यापर्यंत आणणाऱ्या त्याच्या वडिलांची बोळवण केली. आरसीएफ पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरात हा विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. याच परिसरात आरोपी महिलेचेही घर आहे. हा विद्यार्थी आणि आरोपी महिलेचा मुलगा मित्र. घट्ट मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी त्यांची ये-जा होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हा विद्यार्थी मित्राला शोधण्यासाठी त्याच्या घरी गेला. मित्र घरी नव्हता. मात्र त्याच्या आईने विद्यार्थ्याला थांबवून ठेवले. शीतपेय प्यायला दिले. ते पिताच विद्यार्थ्याची शुद्ध हरपली. ही संधी साधत महिलेने त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. या गडबडीत महिलेने विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो आपल्या मोबाइलने काढले. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेल्या विद्यार्थ्याला घडला प्रकार लक्षात आला. त्याने विचारणा केली तेव्हा महिला भडकली. तिने त्याला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर ती रोजच या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करू लागली.मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र दहावीच्या परीक्षेचे टेन्शन असल्याचे सांगून तो वेळ मारून नेत होता. काही दिवसांनंतर त्याने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली. त्यानुसार त्यांनी आरसीएफ पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. मात्र त्यावेळी महिलेच्या तक्रारीला घाबरून मुलाने पोलिसांसमोर तोंड उघडले नाही. त्यामुळे पोलिसांनीही या महिलेला समज देत सोडून दिले. त्यानंतर तर या महिलेचा कहर आणखी वाढला. ती विद्यार्थ्याला बाहेर विविध ठिकाणी भेटू लागली. त्याच्यावर अत्याचार करू लागली. तिने नवी मुंबईतील एका मंदिरात जाऊन या मुलासोबत जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर ती मुलाला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागली. तिची मागणी पूर्ण करण्यासाठी हा विद्यार्थी घरी चोऱ्या करू लागला. मात्र काही दिवसांनी त्याने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्याने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.