शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

विद्यार्थी मुकणार नोकर्‍यांना

By admin | Updated: May 19, 2014 03:07 IST

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत जाहीर होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांवर आपली नोकरी गमविण्याची वेळ आली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत जाहीर होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांवर आपली नोकरी गमविण्याची वेळ आली आहे. पुनर्मूल्यांकनाच्या निकालातील गोंधळ अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर ८च्या परीक्षेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. इंजिनीअरिंगच्या सेमिस्टर ७चा निकाल विद्यापीठाने खूपच उशिरा जाहीर केला. उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात असंख्य चुका झाल्याचे समोर आले. निकालाची सत्यता पडताळण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. मात्र, पुनर्मूल्यांकनावेळी विद्यार्थ्यांना अनेक कटू अनुभव आले. विद्यार्थ्यांचे निकाल तीन ते चार वेळा वेगवेगळे आले. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून प्लेसमेंट देण्यात आली आहे; तर काही विद्यार्थी एक वर्षापूर्वीच नोकरी करत आहेत. नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेमिस्टर ७चा निकाल सादर करणे महत्त्वाचे आहे. परंतु विद्यापीठाच्या सेमिस्टर ७च्या निकालात असंख्य चुका झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांची परीक्षा चार दिवसांनंतर सुरू होत आहे. तरीही सेमिस्टर ७चा पुनर्मूल्यांकनाचा निकाल हाती न आल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. परीक्षेचा अभ्यास करायचा की निकालाची चौकशी करण्यासाठी रोज विद्यापीठात हेलपाटे मारायचे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. निकालात दुरुस्ती करण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सोमवारची डेडलाइन दिली आहे.