शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीचा आलेख घसरला !

By admin | Updated: October 6, 2014 00:06 IST

तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना विशेष पुरस्कार.

ब्रम्हानंद जाधवमेहकर (अकोला) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असल्याचे चित्र आहे. तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्यभर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल असलेले खटले व नव्याने निर्माण होणारे तंटे सर्वसहमतीने मिटविण्यासाठी आणि सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या हेतूने १५ ऑगस्ट २00७ पासून हे अभियान सुरू झाले. तंटामुक्त अभियानात विशेष कामगिरी करणार्‍या गावांना विकास कामांसाठी गृह विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतात. सुरवातीला या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. पहिली तीन वर्षे पुरस्कार मिळविण्यासाठी राज्यातील सर्वच गावांमध्ये चढाओढ होती. मात्र त्यानंतर या अभियानाला विशेष सकारा त्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. २00७-0८ मध्ये २ हजार ३२८, २00८-0९ मध्ये २ हजार ८११ व २00९-१0 मध्ये ४ हजार २४९ म्हणजेच पहिल्या तीन वर्षांत एकूण ९ हजार ३८८ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला. ८७७ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांत तंटामुक्त अभियानास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. २0१0-११ मध्ये ३ हजार ८२४, २0११-१२ मध्ये २ हजार ७१२ व २0१२-१३ मध्ये १ हजार ७४१ म्हणजेच मागील तीन वर्षांत एकूण ८ हजार २७७ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, केवळ ३९३ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार मिळाला आहे.