शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

तंटामुक्तीचा आलेख घसरला !

By admin | Updated: October 6, 2014 00:06 IST

तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना विशेष पुरस्कार.

ब्रम्हानंद जाधवमेहकर (अकोला) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असल्याचे चित्र आहे. तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्यभर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल असलेले खटले व नव्याने निर्माण होणारे तंटे सर्वसहमतीने मिटविण्यासाठी आणि सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या हेतूने १५ ऑगस्ट २00७ पासून हे अभियान सुरू झाले. तंटामुक्त अभियानात विशेष कामगिरी करणार्‍या गावांना विकास कामांसाठी गृह विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतात. सुरवातीला या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. पहिली तीन वर्षे पुरस्कार मिळविण्यासाठी राज्यातील सर्वच गावांमध्ये चढाओढ होती. मात्र त्यानंतर या अभियानाला विशेष सकारा त्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. २00७-0८ मध्ये २ हजार ३२८, २00८-0९ मध्ये २ हजार ८११ व २00९-१0 मध्ये ४ हजार २४९ म्हणजेच पहिल्या तीन वर्षांत एकूण ९ हजार ३८८ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला. ८७७ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांत तंटामुक्त अभियानास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. २0१0-११ मध्ये ३ हजार ८२४, २0११-१२ मध्ये २ हजार ७१२ व २0१२-१३ मध्ये १ हजार ७४१ म्हणजेच मागील तीन वर्षांत एकूण ८ हजार २७७ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, केवळ ३९३ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार मिळाला आहे.