शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

मुंबईत जोरदार सरी

By admin | Updated: June 14, 2015 03:53 IST

मुंबईसह उपनगरांत शनिवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर पावसादरम्यान झालेल्या वाहतूक

मुंबई : मुंबईसह उपनगरांत शनिवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर पावसादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांची सकाळची अर्धाअधिक वेळ पाण्यातच गेली. मान्सून शुक्रवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिला दिवस कोरडाच गेला. तर शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. उदंचन पंप व मनुष्यबळाच्या मदतीने येथील पाण्याचा निचरा करण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक पूर्वपदावर आली. तर लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला आणि घाटकोपर येथे पावसादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीने प्रवाशांच्या नाकी नऊ आणले होते. सकाळी सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र होते. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली.महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसादरम्यान शहरात १४, पूर्व उपनगरांत ५ आणि पश्चिम उपनगरांत १२ अशी एकूण ३१ ठिकाणी झाडे पडली. महालक्ष्मी पुलाजवळ झाड पडून दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.