शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सुदृढ जिल्हा बँका करणार शेजारच्या जिल्ह्यात कर्जवाटप

By admin | Updated: September 8, 2015 01:30 IST

राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा

मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांना अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत अशा जिल्ह्यांत व्यावसायिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे याकरिता प्रयत्न करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांनी खरीप हंगामाचे कर्ज शेतकऱ्यांना दिलेले नाही. उस्मानाबाद बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के तर यवतमाळ बँकेने ५० टक्के कर्ज दिले आहे. याखेरीज अन्य काही बँकांनी कर्जपुरवठ्याचे निकष पूर्ण केले असले तरी सततच्या दुष्काळामुळे कर्ज वसुलीअभावी त्यांचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या समस्येतून मार्ग काढण्याकरिता रिझर्व्ह बँकेला विनंती केली आहे, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.खरिपाच्या हंगामात ३२ हजार २४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप १५ आॅगस्ट २०१५पर्यंत झाले होते. जिल्हा बँकांनी ११ हजार ६०८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करावे असे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी ११ हजार ३८३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेले आहे. यापैकी ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. दरवर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जात होते. यंदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती वाढली ते सप्टेंबर अखेरीस स्पष्ट होईल. (विशेष प्रतिनिधी)