शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

सुदृढ जिल्हा बँका करणार शेजारच्या जिल्ह्यात कर्जवाटप

By admin | Updated: September 8, 2015 01:30 IST

राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा

मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांना अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत अशा जिल्ह्यांत व्यावसायिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे याकरिता प्रयत्न करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांनी खरीप हंगामाचे कर्ज शेतकऱ्यांना दिलेले नाही. उस्मानाबाद बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के तर यवतमाळ बँकेने ५० टक्के कर्ज दिले आहे. याखेरीज अन्य काही बँकांनी कर्जपुरवठ्याचे निकष पूर्ण केले असले तरी सततच्या दुष्काळामुळे कर्ज वसुलीअभावी त्यांचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या समस्येतून मार्ग काढण्याकरिता रिझर्व्ह बँकेला विनंती केली आहे, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.खरिपाच्या हंगामात ३२ हजार २४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप १५ आॅगस्ट २०१५पर्यंत झाले होते. जिल्हा बँकांनी ११ हजार ६०८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करावे असे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी ११ हजार ३८३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेले आहे. यापैकी ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. दरवर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जात होते. यंदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती वाढली ते सप्टेंबर अखेरीस स्पष्ट होईल. (विशेष प्रतिनिधी)