शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महायुतीत टोकाचा तणाव

By admin | Updated: September 15, 2014 04:38 IST

राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली

मुंबई : राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाढवून मिळत नसल्याने भाजपाचे नेते नाराज असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट टीका केल्याने भाजपा नेत्यांचा अक्षरश: तीळपापड झाला आहे.शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता शुक्रवारी भाजपाच्या नेत्यांनी मातोश्री गाठले होते. मात्र एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेनेने बैठकीत घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा हे सूत्र वर्षानुवर्षे ठरलेले असून त्यामध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केल्याने भाजपाचे नेते निराश होऊन परतले. शनिवारी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करताना लोकसभा निवडणुकीत विजय केवळ एकट्या नरेंद्र मोदी यांचा नाही तर शिवसेनेचाही त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे मत व्यक्त केले. यामुळे भाजपा नेत्यांचा तीळपापड झाला. शनिवारी रात्री भाजपा नेत्यांची बैठक झाली व त्यामध्ये या टीकेचा समाचार घेण्याचे ठरले. राज्यात भाजपा नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास इतकी अनुकूल संधी पुन्हा येणार नाही, असे भाजपाला वाटते. शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली आणि १३५ किंवा त्यापेक्षा अधिक जागा दिल्या तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा पाया खिळखिळा केल्यासारखे होईल, अशी भीती शिवसेनेला वाटते. (विशेष प्रतिनिधी)