शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

रोजच्या वाहतूककोंडीमुळे वाढत आहे ताणतणाव!; मधुमेह, थकवा आणि हृदयरोगाला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:41 IST

‘एज ऑफ रेज’ राष्ट्रीय सर्वेक्षणाचे निष्कर्ष

ठाणे : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमधील लोकांमध्ये वाढत असलेल्या मानसिक ताणतणावांचे एक प्रमुख कारण शहरातील वाहतूककोंडी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नैराश्य, संताप, मधुमेह, थकवा व हृदयरोग असे मोठे आजारही होऊ शकतात. एका कंपनीने भारतातील महत्त्वाच्या १० शहरांमध्ये केलेल्या ‘एज ऑफ रेज’ या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे.

महानगरांमधील अर्ध्यापेक्षा जास्त ५६ टक्के लोकांनी मान्य केले आहे की, वाहतूककोंडीमुळे जर ऑफिसला, कामाला जायला उशीर होत असेल, तर वाहतूक नियमांची पायमल्ली करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. २० टक्के व्यक्ती त्यांचा स्वभाव रागीट आणि तापट होण्यामागे प्रमुख कारण ट्रॅफिक असल्याचे सांगतात.

अनेक लोकांना असे वाटते की, ‘रोड रेज’ म्हणजे हिंसक घटना होय. पुढील गाडीच्या अगदी जवळून गाडी चालविणे, अचानक किंवा नियमबाह्य पद्धतीने लेन बदलणे, अतिवेग आणि इतरांना धमक्या देणे, हे प्रकारदेखील रोड रेजचाच भाग आहेत. देशात ८९ टक्के लोक सांगतात की, त्यांना ताणतणावांचा त्रास होत आहे. जागतिक पातळीवर याचे सरासरी प्रमाण ८६ टक्के आहे. सर्वेक्षणानुसार वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडावे लागल्यामुळे कितीतरी लोकांना राग आणि भांडणांना सामोरे जावे लागते. त्यातूनच नैराश्य आणि ताणतणाव वाढत आहेत. त्यातून मधुमेह, थकवा आणि हृदयरोग होण्याची शक्यता बळावते, असे तज्ज्ञ सांगतात.

डॉ. जयेश लेले म्हणाले की, हायपर टेन्शनग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचे एक प्रमुख कारण म्हणजे शहरातील वाहतूककोंडी होय. गतिहीनतेमुळे नीट झोप लागत नाही. शरीरात मेलॅटोनिनचा स्राव मोठ्या प्रमाणावर होतो. वाहतूककोंडीत अडकल्याच्या भावनेमुळे क्लॉस्ट्रोफोबिया होऊन नैराश्य निर्माण होते.राग वाहतूक पोलिसांवर

  • ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागलेले १६ टक्के लोक आपला राग टॅक्सी ड्रायव्हर्स आणि वाहतूक पोलिसांवर काढतात. यामुळे रस्त्यावरील गोंधळात आणखीनच भर पडते.
  • ड्रायव्हिंगमुळे होणारे मानसिक ताणतणाव आणि त्यामुळे होणारे आजार आरोग्याला अतिशय घातक ठरतात.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी