शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मृद प्रयोगशाळांचे बळकटीकरण

By admin | Updated: November 4, 2015 02:36 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात मृद आरोग्य व्यवस्थापन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून फिरती व स्थायी मृद

मेहकर (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात मृद आरोग्य व्यवस्थापन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून फिरती व स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार असून शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळांचेही बळकटीकरण करण्यात येणार आहे. माती परीक्षण करून त्यानुसार पीक घेतल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. पिकांची निवड करण्यासाठी माती तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनस्तरावरून राष्ट्रीय सूक्ष्मसिंचन अभियान, सेंद्रिय शेती प्रकल्प, मृद आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन प्रकल्प आणि कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रम या सर्व योजना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान म्हणून राबविण्यात येतात. या अभियानांतर्गत केंद्राचा हिस्सा ५० टक्के व राज्याचा हिस्सा ५० टक्के आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागासाठी केंद्राकडून ६ कोटी ३९ लाख रुपये व राज्याकडून ६ कोटी ३९ लाख रुपये, असे एकूण १२ कोटी ७८ लाख रुपये मंगळवारी मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटीफिरती व स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी सर्वाधिक रक्कम ७ कोटी २८ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे. तर, शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी रुपये व खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.