शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या प्राण्यांशी नातं जोडणारं 'अवलिया'; कुटंबीताल माणसं सोडून गेली अन् परिस्थितीनं हतबल केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 12:11 IST

प्राण्यांचे सुख सोधून नाते जोडणारा जगदीश यांनी अनोखे नाते बांधले : निरंतर सेवा करतो

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी (गोंदिया)  : मानव तंत्रज्ञानाच्या युगात खूप प्रगती आणि उंची गाठण्याची हौस प्रत्येकात निर्माण व्हावी हा सर्वाचा प्रयत्न असतो,  पण विज्ञानवादी, जगण्याचा सम्यक सन्मार्ग प्राणी मात्राचा जीवन शोधणारी महापुरुष व मोठी माणसं होऊन गेली आणि झाली, अशाच प्रकारची एक प्रेरणा घेणारा, अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे जगदीश मेश्राम. मांजर, कुत्री, जनावरे व रानातील माकडे यांच्या जीवाची काळजी करुन त्यांचे सुख सोधून आपले प्राण्यांशी नाते जोडले आहे, ही एक अनोखी नात्यांची कथा पाहण्यास मिळाली. 

परिसरातील येरंडी-देवलगाव या गावचा राहणारा जगदीश बकाराम मेश्राम (वय ५१) हलाखीच्या परिस्थितीत जगदीश एकटाच स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे जगतो आहे. या गावात अनेक व्यक्तिमत्त्वांची वेगळीच ओळख असून परिचीत आहे. काही वर्षांपुर्वी कुटुंबातील माणसे सोडून गेली. जगदीश हा बी.एस्सी. शिकलेला असून इंग्रजीचे वाक्य फाळफाळ बोलतो, पूर्वीपासून हुशार होता पण परिस्थितीने हतबल केले, या सर्व दुःखावर मात करुन आंनदाने प्राण्यांच्या सहवासात जगदीश आजही जीवन जगत आहे. 

जगदीशच्या मनावर अनेक महामानव व महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे, म्हणूनच अहिंसावादी बुद्धांचा प्राणीमात्रावर दया करा, असा  विचार घेऊन हा अवलिया प्राण्यांच्या सहवासात रमतो आहे. जगदीश राहतो तिथे सोबत मांजर व कुत्री राहतात. जणू परिवारच झाल्यागत...पोट भरण्यासाठी अनेक काम पाहणे तर कधी मागून खाणे, भाजीपाला बाजारात मागणे,  अशारितीने जगदीश आंनदाचे जीवन गाणे गात जगतो. भाजीपाला जर जास्त असला तर तो जनावरांना खाऊ घालतो, फळ वेगेरे मिळाली तर तो सोबत राहणा-या सदस्यांच्या सोबत खातो. कुठे कार्यक्रमात जेवायला गेला तर स्वतः तिथे खातो आणि राहणा-या मांजर व कुत्रीसाठीही घेऊन जातो. गावालगत अमराई आहे, अमराईत जंगलातील माकडांचा  समुह राहतो, त्या बारा-पंधरा माकडांना दररोज जगदीश सकाळ, दुपार व सायंकाळी या वेळेत गावातील पाणी माकडांना पिण्यासाठी घेऊन जातो. हे काम तो तीन चार महिन्यांपासून करतांना जगदीश दिसतो आहे. अशा नात्याला व प्रेमाला काय म्हणावे.... ही जगदीशची किमयाच न्यारी... हे अनोखेच नातेसंबंध प्राण्यांशी जपतो तो फक्त जगदीश मेश्राम. ही सेवा, हे प्राण्याविषयीचे प्रेम मनात घर करणारे आहे, आपण मानवाला सहसा जपत नाही,  तर येथे प्राण्यांना सुख समाधान देणारा माणूस पाहायला मिळतो. हा एक समाजाला आदर्शाचा उदाहरण असला पाहीजे.

मी बुद्धांपासून सर्व शिकलो,  रोजच पाणी पाजतो, जेवनही देतो. या गोष्टीत मला सुख-समाधान मिळतो. हेच माझं काम आहे. - जगदीश बकाराम मेश्राम, येरंडी-देवलगाव 

जगदीशच्या कार्याचे कौतुक तर केलेच पाहीजे, पण समाजाला एक आदर्श देण्याचेही काम केले, अशी जगदीशची माकडांना पाणी घेऊन जातांना ही वास्तववादी मुलाखत घेण्यास मिळाली. "प्राण्यांचे सुख हे जगदीशचे सुख" असे नातेसंबंध जोडून सुख देण्या-या कार्याला व आदर्शाला सलामच आहे.