शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: August 12, 2016 02:19 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील

वडखळ/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान विशेषत: खारपाडा ते वडखळ पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. तसेच हमरापूर फाटा ते सोनखार, दादर व कोपर फाटा ते कोपर या रस्त्यावर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात जि. प. सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, यशवंत घासे, माजी अध्यक्ष अनंत पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष हितेश पाटील, महिला अध्यक्षा पूजा मोकल, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी पाटील यांच्यासह विभागातील सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वैकुंठ पाटील म्हणाले की, आज हमरापूर-दादर रस्ता तसेच महामार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत, परंतु स्थानिक आमदार काहीही करत नाहीत. फक्त निवडणुकीच्या काळात येतात, नंतर गायब होतात असे सांगितले. येथून ये-जा करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लगत आहे. त्यामुळेच हे आंदोलन करत आहोत, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही असे सांगून जर का येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कौसल्या पाटील, अनंत पाटील, अविनाश पाटील, मच्छिंद्र पाटील, शिवाजी पाटील आदींनीही खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी विनित गोवेकर यांनी येत्या २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच हमरापूर-दादर रस्त्यावरील खड्डे देखील भरले जातील असे बांधकाम खात्याचे अधिकारी करपे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.