शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

चर्चवर दगडफेक करणारे मोकाटच

By admin | Updated: March 23, 2015 01:05 IST

नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर दगड फेकणारे अद्याप मोकाट असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यात रविवारी उशिरापर्यंत पोलिसांना यश आले नव्हते.

पनवेल : नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर दगड फेकणारे अद्याप मोकाट असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यात रविवारी उशिरापर्यंत पोलिसांना यश आले नव्हते. या घटनांचा विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी निषेध नोंदवला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नेरे बाजूने मोटारसायकलवरून तिघे जण आले व त्यांनी गेटच्या बाहेरून आतमध्ये दगड फेकून पोबारा केला. ही घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असली तरी त्या फूटेजमध्ये अस्पष्ट चित्रीकरण झाले आहे. काळोख असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन थोरात यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी चर्चला भेट देऊन मेंबर्सशी चर्चा केली. या प्रकारचा निषेध नोंदवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ख्रिश्चन बांधवांनी कोणत्याही उग्र प्रतिक्रिया दिल्या नाहीत.सामंजस्यांची भूमिका घेत तपासयंत्रणांना सहकार्य केले. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्णत: विश्वास असून, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना पकडून शासन करेल, असा विश्वास चर्चच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)‘चर्चला सुरक्षा द्या’च्पनवेल येथील चर्चवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत द बॉम्बे कॅथलिक सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.च्मुंबईतील ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांवर खुलेआम हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सभेचे अध्यक्ष जॉर्डन डिसूजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, काही जातीयवादी संघटना राज्यात अनास्था माजवण्यासाठी हा प्रयत्न करीत आहेत. सरकारने तो राज्यभर पसरू देता कामा नये, म्हणून सभेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.च्सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी डिसूजा यांनी केली. शिवाय राज्यातील चर्च आणि ख्रिस्ती समाजाच्या शाळांबाहेर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. हजारो ख्रिस्ती बांधवांनी मुंबईतील रस्त्यांवर १०० किलोमीटरहून लांब मानवी साखळी उभारली.