शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे पोलीस दल लोकाभिमुख करणार

By admin | Updated: October 1, 2015 03:10 IST

गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल

मुंबई : गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल, असे प्रतिपादन राज्याचे नूतन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी बुधवारी केले. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी राज्यभर ‘पोलीस मित्र’सारखी संकल्पना राबवून पोलिस दल लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेही दीक्षित यांनी म्हटले आहे. मावळते पोलीसप्रमुख संंजीव दयाल यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,‘महाराष्ट्र पोलीस हे देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्याचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारताना मला जबाबदारीची जाणीव आहे. संजीव दयाल यांनी गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले, आपलाही त्यावर भर राहणार असून त्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक उपायांचा वापर अधिकाधिक केला जाईल. तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अवगत करता आले पाहिजे. असे सांगून दीक्षित म्हणाले,‘नागरिकांनी आपला ऐवज,मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरुक राहून पोलिसांना सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. त्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना खूप उपयुक्त ठरत आहे. नागपूरला आयुक्त म्हणून कार्यरत असताना ती यशस्वी ठरली होती,आता राज्यभर त्याची व्याप्ती वाढविली जाईल, त्यातून रस्त्यावरील गुन्ह्यांच्या अटकावाबरोबरच दहशतवादी कारवायांवरही प्रतिबंध घालणे शक्य आहे. त्याचप्रमाणे महिला, मुले, जेष्ठ नागरिक व अल्पसंख्याक समाजाच्या हक्क व संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल. राज्यातील औद्योगिकरण वाढविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांंना पूरक वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल. सव्वा दोन लाखांवर पोलिसांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)----------‘सनातन’बाबत अधिक माहिती घेऊन कारवाईसनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता दीक्षित म्हणाले,‘यापूर्वीच्या प्रस्तावाला चार वर्षांचा अवधी झाला आहे. त्यानंतर संस्थेची कार्यपद्धती कशी राहिली आहे, याची माहिती घेवून त्यांच्यावर बंदीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून आता त्याबाबत अधिक बोलणे उचित नाही.डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून सुरु असून त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य पोलिसांकडून पुरविले जाईल.