शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

राज काय बोलणार, याचीच राज्यभर चर्चा

By admin | Updated: May 31, 2014 11:40 IST

पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत

अतुल कुलकर्णी , मुंबई -  पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत. ‘या मला आपल्याशी बोलायचं आहे...’ असे भावनिक आवाहन करीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मनसैनिकांना आवाहन केले आहे, तर शिवसेनेने लोकसभेत मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी येण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय, मनसेच्या मतांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे काहीशा नाराज मनसैनिकांपुढे आता पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला होता. राज यांनी निवडणुकीच्या काळात घेतलेल्या भूमिकेवरदेखील टीकाटिप्पणी झाली. भाजपा-शिवसेनेलादेखील अपेक्षित नसणारा विजय महाराष्टÑात मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादीदेखील या मोदी लाटेत भूईसपाट झाले. आम आदमी पक्षालादेखील राज्यात टिकाव धरता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती एकदम जोषात आलेली असताना मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला होता. त्यानंतर, स्वत: उद्धव ठाकरे यांनीदेखील शिवसैनिकांना आपण मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असल्याचे जाहीर करून राज यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात भाजपा-शिवसेनेची अवस्था फार चांगली होती, असे चित्र कधीच नव्हते. शिवसेनेपेक्षा भाजपाची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र, नरेंद्र मोदी नावाच्या टॉनिकने भाजपाचे नेते अवघ्या काही दिवसांत ताजेतवाने तर झालेच आणि आता स्वबळावरची भाषा करू लागले. निवडणुकीच्या निकालानंतर आजपर्यंत राज एकही शब्द माध्यमांशी बोलले नाहीत की, कुठे बाहेरही फारसे दिसले नाहीत. मात्र, त्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा पडद्याआड चालूच होत्या. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे उद्या काय भाषण करणार, याचीच उत्सुकता माध्यमांमध्येदेखील आहे. उद्या सोमय्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच पक्षांनी आता कंबर कसल्याचे आणि कुरघोडीचे राजकारण करण्याचे मनसुबे आखल्याचे स्पष्ट होत आहे.