शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

राज्याला 124 कोटींचे मागास क्षेत्र अनुदान प्राप्त

By admin | Updated: October 12, 2014 01:59 IST

मागास क्षेत्र अनुदान निधी (बीआरजीएफ) योजनेच्या अंमलबजावणीसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने 395 कोटी 93 लक्ष रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.

सुहास सुपासे - यवतमाळ
मागास क्षेत्र अनुदान निधी (बीआरजीएफ) योजनेच्या अंमलबजावणीसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने 395 कोटी 93 लक्ष रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, धुळे व अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी  124 कोटी 36 लाख रुपयांचा पहिला हप्ता राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहे. 
केंद्र शासनाकडून  2क्क्7-क्8 पासून मागास क्षेत्र अनुदान निधी (बीआरजीएफ) योजना राबविण्यात येते. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नांदेड, नंदूरबार आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
प्रादेशिक असमतोल दूर करून स्थानिक पायाभूत सुविधांमधील कच्चे दुवे जोडणो, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून पंचायत व नगरपालिका स्तरावरील स्थानिक प्रशासनास बळकटी देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जातात, संस्थांची क्षमताबांधणी केली जाते. लोकसहभागातून गाव आराखडा तयार करून त्याचे पंचायत समितीद्वारा एकत्रिकरण केले जाते व जिल्हास्तरावर ग्रामीण व 
नागरी विभागाचा एकत्रित जिल्हा आराखडा तयार केला जातो. 
त्यानंतर जिल्हास्तरावर नियोजन समितीची मंजुरी घेऊन हे आराखडे केंद्र सरकारला सादर केले जातात. राज्यस्तरावर उच्चाधिकार 
समितीच्या अवलोकनार्थ ते सादर केले जातात. केंद्र शासनाने
 मंजूर केलेल्या निधीतून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांत मंजूर आराखडय़ानुसार विकासाची कामे हाती घेण्यात
 येतात.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी मिळालेल्या पहिल्या हप्त्यातील 124.36 कोटी निधीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 19 कोटी 19 लाख 
रुपये, अनुसूचित जातीसाठी 15
कोटी 2क् लाख तर सर्वसाधारण गटासाठी 89 कोटी 16 लाख 
रुपयांचा अंतर्भाव आहे. 
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे नियंत्रक राहतील.