शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:55 IST

राज्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाºयासह झालेल्या पावसाने तडाखा दिला.

नाशिक/पुणे/नगर : राज्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाºयासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. रविवारी नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी आणि आंबा पिकाचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात वीज पडून तीन विद्यार्थी व एक महिला, तर नगर जिल्ह्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला.नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. दिंडोरी तालुक्यात मौजे मानोरी येथे वीज पडून सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड हे तीन विद्यार्थी व चांदवड तालुक्यात खडक ओझर येथे जनाबाई सुभाष गिरी (४०) यांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शनिवारी रात्री राहुल बाळासाहेब पवार (३३) या शेतकºयाचा वीज पडून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात वादळाने घराची भिंत पडून पाच जण जखमी झाले. नेवासा तालुक्यात वादळाने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी खांबावर चढलेले कंत्राटी कामगार नितीन राजेंद्र घोरपडे (२४) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. कर्जत येथे विजेची तार तुटल्याने दोन बैल ठार, तर गुराखी जखमी झाला. पावसाने फळबागांचे नुकसान झाले.पुणे जिल्ह्यात दुसºया दिवशीही वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. खेड शिवापूर, यवत, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागापासून घोडेगावपर्यंत वादळी पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात पावसाने केळीचे खांब आडवे झाले.>पावसाचा इशारामध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५ अंश तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.