शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:47 IST

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीमध्ये एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करुन वेतनवाढीबाबत सन्मान्य तोडगा सादर करावा, तो निश्चित मान्य केला जाईल. एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन निश्चितच सकारात्मक आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध एसटी कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष शैलेश विश्वकर्मा, फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव, कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अभय गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी कामगारांच्या वेतनात वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी शासन सकारात्मक आहे. या कर्मचाऱ्यांना किती वेतनवाढ देणे शक्य होईल याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. समितीमध्ये एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधीही असतील. एसटी महामंडळावर बोजा पडून ते अजून तोट्यात जाणार नाही यादृष्टीने तसेच कामगारांनाही चांगली पगारवाढ मिळेल यादृष्टीने विचारविनिमय करून समितीने सन्मान्य तोडगा काढावा. शासनामार्फत त्याला मान्यता दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेही गरजेचे आहे. त्यासाठी महामंडळाने विविध कल्पक स्त्रोत विकसीत करावेत. कर्मचारी संघटनांनीही याबाबत सूचना कराव्यात. शासनामार्फत त्यालाही निश्चित मान्यता देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले की, दिवाळीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने एसटी कामगार संघटनांनी संप करु नये, असे आवाहन आपण केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर आपण सुरुवातीपासूनच सकारात्मक आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण विविध निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस