शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भाजपाच्या नेत्यांमुळेच राज्य सरकार अस्थिर

By admin | Updated: August 4, 2016 04:38 IST

फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडण्याचा प्रयत्न होतो. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जाहीर वक्तव्य करतात. त्यावरून भाजपाचेच नेते फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते, असे राणे म्हणाले. ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ असे फडणवीस सांगतात. पण ते मी अखंड महाराष्ट्र ठेवीन असे का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. एकेकाळी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता असलेल्या फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपाचे मंत्री आणि आमदारांना राज्य तोडायचे आहे. त्यांचा प्रयत्न अयोग्य आहे. उत्तराखंड वगळता छोट्या राज्याचा विकास झालेला नाही. केंद्राच्या निधीवरच अशा राज्यांना अवलंबून राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे राणे म्हणाले. राज्यातील प्रशासन निष्क्रिय बनले असून त्यावर मुख्यमंत्र्यांसह कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाची अवस्था ‘सैराट’ झाली असल्याची टीका त्यांनी केली. कोकणातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांना निधी देण्यात न आल्यामुळे ते बंद ठेवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>शिवसेनेला टोमणा : विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाईट अवस्था झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून शिवसेना भाजपाबरोबरची युती तोडत नाही, असे राणे म्हणाले.