शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नेत्यांमुळेच राज्य सरकार अस्थिर

By admin | Updated: August 4, 2016 04:38 IST

फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडण्याचा प्रयत्न होतो. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जाहीर वक्तव्य करतात. त्यावरून भाजपाचेच नेते फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते, असे राणे म्हणाले. ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ असे फडणवीस सांगतात. पण ते मी अखंड महाराष्ट्र ठेवीन असे का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. एकेकाळी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता असलेल्या फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपाचे मंत्री आणि आमदारांना राज्य तोडायचे आहे. त्यांचा प्रयत्न अयोग्य आहे. उत्तराखंड वगळता छोट्या राज्याचा विकास झालेला नाही. केंद्राच्या निधीवरच अशा राज्यांना अवलंबून राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे राणे म्हणाले. राज्यातील प्रशासन निष्क्रिय बनले असून त्यावर मुख्यमंत्र्यांसह कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाची अवस्था ‘सैराट’ झाली असल्याची टीका त्यांनी केली. कोकणातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांना निधी देण्यात न आल्यामुळे ते बंद ठेवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>शिवसेनेला टोमणा : विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाईट अवस्था झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून शिवसेना भाजपाबरोबरची युती तोडत नाही, असे राणे म्हणाले.