शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अरुणाचलच्या महिलेला राज्य सरकारची मदत

By admin | Updated: April 29, 2016 06:05 IST

लोकांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करताच राज्य सरकारतर्फे त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची योजना आखली

मुंबई : लोकांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करताच राज्य सरकारतर्फे त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची योजना आखली असून, त्याचा प्रत्यय अरुणाचल प्रदेशातील महिलेला नुकताच आला. सदर महिलेने ट्विटरवरून मदतीचे आवाहन करताच भाजपाच्या प्रदेश शाखेच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी त्याची लगेचच दखल केली आणि सरकारची मदत तिला मिळवून दिली.रायगड जिल्ह्यातील सिद्धी इंजिनीअरिंग कंपनीत नोकरी करणाऱ्या अरुणाचलमधील मरन्या डोई या महिलेने काही कारणास्त२६ एप्रिल रोजी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र मिळू शकले नाही. या प्रकाराची माहिती मिळताच तिची बहिण घाईघाईने तिथे पोहोचली. पण तिला स्थानिक पातळीवर कोणतीही मदत मिळत नव्हती. डॉक्टरांनीही शवविच्छेदनास नकार दिल्याने तिचा मृतदेह ताब्यात मिळत नव्हता. तेव्हा तिच्या बहिणीने लिंडा न्यूमोई या महिलेस ही बाब कळवली. लिंडा न्यूमोई यांनी ट्विटरवर या प्रकाराची माहिती टाकली आणि मरन्या डोईच्या बहिणीला मदत करण्याचे आवाहन केले. हा प्रकार श्वेता शालिनी याच्या लक्षात येताच, त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना तो कळवला. आ. ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन करून बुधवारी रात्री मृतदेह बहिणीच्या ताब्यात देण्यात आला. परंतु एवढ्यावरच न थांबता मृतदेह घेउन तिला अरुणाचल प्रदेशातील पासी घाट या गावी जाण्यासाठीची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आली. हे सारे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झाले, असे श्वेता शालिनी यांनी सांगितले. या घटनेतून राज्य सरकारचा आणि प्रशासनाचा मानवी व संवेदनशील चेहरा दिसून येतो, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)