शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

राज्य सरकारने केला गाडगेबाबांचा अवमान

By admin | Updated: May 30, 2015 01:18 IST

माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे,

मुंबई : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. तटकरे म्हणाले, फडणवीस सरकारने संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु केलेल्या अभियानाचे नाव बदलून स्वच्छ महाराष्ट्र अभियान असे केले आहे. त्यासाठी अभिनेता आमिर खानला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे. संत गाडगेबाबांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यासाठी स्वत:च्या हाती झाडू घेतला. असे असताना त्यांचे नाव बदलून संताच्या कार्याचा अवमानच केला आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.अन्यथा २ जूनला आंदोलन राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे ३१ मेच्या रात्रीपासून काही टोल नाके बंद होणार आहेत. या टोलनाक्यांची यादी सरकारने दिलेली आहे. यातील एकही टोल जर बंद झाला नाही तर २ जूनला त्या टोलच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्य सरकारला दिला. (विशेष प्रतिनिधी)च्शिवसेना ही सत्तेसाठी आसुसलेली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. सरकारमध्ये राहूनही शिवसेना सरकारच्या विरोधी भूमिका घेते. जैतापूरबाबतही शिवसेनेला आपली स्पष्ट भूमिका घेता येत नाही. च्एकीकडे त्यांचे मंत्री बोलतात आमचा जैतापूर प्रकल्पाला विरोध नसून स्थानिकांचा विरोध आहे नंतर सावरासावर करत शिवसेना नेते बोलतात आमचा प्रकल्पाला विरोध आहे, नेमकं शिवसेनेची भूमिका काय असून शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केला.