शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर ओढले ताशेरे

By admin | Updated: December 24, 2014 02:01 IST

मुंबईच्या उप जिल्हाधिकारी (अतिक्रमणे) डॉ. श्रीमती पद्मश्री श्रीराम बैनाडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून सरकारने त्यांची आॅगस्टमध्ये गृहनिर्माण या मूळ खात्यात बदली केली

मुंबई : सरकारी कामातील दिरंगाईस आळा घालणे व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन करणे यासाठी करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व्हंट््स रेग्युलेशन आॅफ ट्रान्फर्स अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन आॅफ डिले इन डिस्चार्ज आॅफ आॅफिशियल ड्युटीज अ‍ॅक्ट’ या कायद्यानुसार सरकारी कामात कर्मचारी हेतुपुरस्सर दिरंगाई किंवा निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.मुंबईच्या उप जिल्हाधिकारी (अतिक्रमणे) डॉ. श्रीमती पद्मश्री श्रीराम बैनाडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून सरकारने त्यांची आॅगस्टमध्ये गृहनिर्माण या मूळ खात्यात बदली केली होती. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) १३ आॅक्टोबर रोजी ती रद्द केली. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. अनुप मोहता व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.न्यायालय म्हणते की, या कायद्याने सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेले काम अपेक्षित वेळेत व चोख करण्याची जशी जबाबदारी टाकली आहे, तशीच कामात चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेळीच योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारीही सरकारवर टाकली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंबंधीची शेकडो प्रकरणे आजवर ‘मॅट’ व उच्च न्यायालयाने हाताळली. परंतु यात बव्हंशी या कायद्यातील बदल्यांसंबंधीच्या चार, पाच व सहा या कलमांचाच ऊहापोह केला गेला. या निकालात प्रथमच न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यासंबंधीच्या कलम १०ची साधकबाधक चर्चा केली. न्यायालय म्हणते की, या कायद्याच्या प्रकरण तीनचा मुख्य उद्देश केवळ नोकर व मालक यांच्यातील संबंधांचे नियमन करणे एवढाच नाही, तर कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे कर्तव्य सरकारवर टाकून सुप्रशासन साकारणे हाही आहे. न्यायालय म्हणते की, कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे साधार मत बनले असेल तर कार्यालयीन कामात शिस्त बाणविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणेही अपरिहार्य ठरते. शिवाय शिस्तभंगाची कारवाई केली गेली तर कर्मचाऱ्यासही आपली बाजू मांडून स्वत:वरील आरोप खोडून काढण्याची संधी मिळते.डॉ. श्रीमती पद्मश्री बैनाडे यांच्याविरुद्धही कर्तव्यकसुरीच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच त्यांची बदली केली असे सरकारचे म्हणणे होते. पण न्यायालयाने म्हटले की, तसे होते तर बैनाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे सरकारच्या हातात होते. पण तसे न करता बदली करणे म्हणजे कर्मचाऱ्यास सफाईची संधी न देता त्यास दंडित करणे आहे. या सुनावणीत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार व साहाय्यक सरकारी वकील पी. जी. सावंत यांनी, तर बैनाडे यांच्यासाठी अ‍ॅड. नरेंद्र व अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)