शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आजपासून अकरावीची विशेष प्रवेश फेरी, ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:25 IST

दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला.

मुंबई : दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी राबवण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबर कालावधीत ही फेरी राबविण्यात येणार आहे.दुस-या विशेष प्रवेश फेरीत ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार उत्तीर्ण अथवा एटीकेटी मिळालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले, महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले, प्रवेश अर्जाच्या भाग १ चे अ‍ॅप्रूव्हल न घेतल्याने प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेले, अजूनपर्यंत एकदाही आॅनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे.पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला अर्ज भरून अ‍ॅप्रूव्ह करून घेतला आहे, त्यांनी फक्त दुसरा अर्ज भरावयाचा आहे. मार्गदर्शन केंद्रावर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात. या विद्यार्थ्यांनी अर्जात गुण भरताना गुणपत्रिकेवरील मार्च-जुलै या दोन्ही परीक्षांची गुणांची बेरीज अर्जात भरावयाची आहे.