शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करा

By admin | Updated: March 17, 2015 00:31 IST

सध्या माणसांमध्ये माणुसकीचा अंश राहिलेला नाही. न्यायव्यवस्थेने केलेले कायदे कितीही चांगले असले, तरी त्याचा उपयोग समाजसुधारणेसाठी होताना दिसत नाही.

पुणे : सध्या माणसांमध्ये माणुसकीचा अंश राहिलेला नाही. न्यायव्यवस्थेने केलेले कायदे कितीही चांगले असले, तरी त्याचा उपयोग समाजसुधारणेसाठी होताना दिसत नाही. त्यामुळे समाज कल्याणाकरिता परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, असे मत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विलास चाफेकर यांनी व्यक्त केले. जाणीव आणि वंचित विकास संथेतर्फे यंदाचा ‘अरुणा-मोहन पुरस्कार’ विलास जावडेकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वंचित विकास संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. आसावरी पानसे, संचालक सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर आदी उपस्थित होते. चाफेकर म्हणाले, ‘‘प्रत्येकाने किमान आपल्या कर्तव्याचे आणि नागरिकत्वाचे पालन केले, तरीही समाजात माणुसकी टिकून राहील. सध्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. धनाचा मोह होऊ न देता, ते समाजाचे आहे, असे म्हणणारे द्रष्टे लोक फार कमी आहेत. कोणतेही चांगले काम करण्यासाठी मनाची तयारी आणि धैर्याची गरज असते. वंचित विकाससारख्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीची गरज असतेच, पण शक्य झाल्यास आपला वेळ देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहावे.’’मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)स्वत:चे मूल्यमापन करता यायला हवे४पुरस्काराला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘समाजात काम करताना स्वत:चे मूल्यमापन करता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तिप्रमाणेच प्रसंगाचेही मूल्यमापन करता आले पाहिजे. कोणत्याही दु:खाच्या प्रसंगी आनंदी राहून धैर्याने सामोरे जायला शिका.’’