शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

कोल्हापूर अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: September 25, 2014 21:22 IST

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान -महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता अंबाबाईची उत्सवाच्या पहिल्या माळेला सिंहासनस्थ बैठी रूपात पूजा

कोल्हापूर : दुष्टांचा संहार... असुरांचा नि:पात, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ झाला. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईची उत्सवाच्या पहिल्या माळेला सिंहासनस्थ बैठी रूपात पूजा बांधण्यात आली.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा कालावधी नवरात्रौत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज, गुरुवार पहाटेपासूनच श्री अंबाबाईच्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला. काकडआरती, अभिषेक, पुण्यावहन, आदी विधी झाल्यानंतर सकाळी साडेसात वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली. दुपारच्या आरतीनंतर देवीची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेबरोबरच, अखंड दीपप्रज्वलन, मालाबंधन असे कुलाचार केले जातात. त्यामुळे या विधीला ‘देवी बसली’ असे संबोधतात. म्हणूनच नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला देवीची बैठी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा मनोज मुनीश्वर व अनिकेत अष्टेकर यांनी बांधली. आज सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी शासकीय अभिषेक केला. दिवसभरात देवस्थान समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात श्री संतकृपा सोंगी भजनी मंडळ, पार्वती महिला भजनी मंडळ (इचलकरंजी), अक्कामहादेवी महिला मंडळ (कुरुंदवाड), हनुमान भक्त भजनी मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच, शिवगंधार संगीत संस्था - मनबावरी गाणी या संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) शांततेची अनुभूती...मंदिराचा परिसर अधिकाधिक मोकळा राहावा व भाविकांना प्रसन्नतेचा अनुभव मिळावा, यासाठी दक्षिण दरवाजा येथे महालक्ष्मी बँकेपासून, भवानी मंडप आणि बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड या सर्व ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी व पार्किंगवर बंदी आणण्यात आली आहे. अन्य वेळी गाड्यांमुळे गोंगाट असलेल्या परिसरात आता मात्र शांतता आहे. घरोघरी घटस्थापनानवरात्रौत्सव जसा शक्ती उपासनेचा तसाच सर्जनशीलतेचाही उत्सव. भूगर्भातून उगवणाऱ्या अंकुरातून निर्माण होणाऱ्या तसेच स्त्रीशक्तीच्या नवनिर्मितीच्या क्षमतेबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करणाऱ्या घटाची स्थापना आज घरोघरी करण्यात आली. देवीच्या मूर्तीसमोर पत्रावळीत काळी माती घालून त्यात धान्यांचे बी पेरण्यात आले. मध्यभागी मातीचा घट ठेवून त्यावर पाना-फुलांची माळ सोडण्यात आली. अखंड नंदादीप प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखविण्यात आला. यानिमित्त महिला व्रतवैकल्ये करतात. काहीजण घटस्थापनेपासून अष्टमीपर्यंत असे उठता-बसता उपवास करतात; तर काहीजण नऊ दिवस अखंड उपवास करतात. कोल्हापुरातील वरप्राप्त देवता कात्यायनी व त्र्यंबोली देवी येथे रात्रंदिवस महिला भाविक नवरात्रकरी म्हणून बसतात.