शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

गरिबांकरिता स्वतंत्र बँका सुरू करा

By admin | Updated: September 7, 2015 01:53 IST

सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे

मुंबई : सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, अशी सूचना नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी रविवारी केली.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी युनुस यांची भेट घेऊन चर्चा केली. गरीबी निर्मूलनाकरिता बांगलादेशात राबवण्यात येत असलेल्या प्रयोगांची माहिती युनुस यांनी दिली. ग्रामीण बँकेचा प्रयोग, सूक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. जगभरातील बहुतांश गरीब समाज बँकींग क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता त्यांना बँकींग क्षेत्रात आणले पाहिजे. कर्जाची परतफेड गरिबांकडून जास्त प्रमाणात होते असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. याकरिता प्रस्थापित व्यावसायिक बँकांऐवजी गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करणे गरजेचे आहे.बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के सहभाग गरीब महिलांचा होता. या चळवळीत कर्ज परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के होते. या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबर आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या महिलांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ग्रामीण बँकेमार्फतच सामाजिक उद्योगाच संकल्पना राबवण्यात आली, असे युनुस यांनी सांगितले.गरिबांना दया दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा व महिला सक्षमीकरणाचा हा बांगलादेशातील प्रयोग महाराष्ट्रात अमलात आणण्यात येईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना सुपर हॅप्पीनेस ग्रुप बनवण्याकरिता शासन प्रयत्न करील, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)