शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

गरिबांकरिता स्वतंत्र बँका सुरू करा

By admin | Updated: September 7, 2015 01:53 IST

सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे

मुंबई : सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, अशी सूचना नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी रविवारी केली.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी युनुस यांची भेट घेऊन चर्चा केली. गरीबी निर्मूलनाकरिता बांगलादेशात राबवण्यात येत असलेल्या प्रयोगांची माहिती युनुस यांनी दिली. ग्रामीण बँकेचा प्रयोग, सूक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. जगभरातील बहुतांश गरीब समाज बँकींग क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता त्यांना बँकींग क्षेत्रात आणले पाहिजे. कर्जाची परतफेड गरिबांकडून जास्त प्रमाणात होते असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. याकरिता प्रस्थापित व्यावसायिक बँकांऐवजी गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करणे गरजेचे आहे.बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के सहभाग गरीब महिलांचा होता. या चळवळीत कर्ज परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के होते. या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबर आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या महिलांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ग्रामीण बँकेमार्फतच सामाजिक उद्योगाच संकल्पना राबवण्यात आली, असे युनुस यांनी सांगितले.गरिबांना दया दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा व महिला सक्षमीकरणाचा हा बांगलादेशातील प्रयोग महाराष्ट्रात अमलात आणण्यात येईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना सुपर हॅप्पीनेस ग्रुप बनवण्याकरिता शासन प्रयत्न करील, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)