शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

केंद्रीय कृषी योजनेतून तूर खरेदी सुरू

By admin | Updated: May 10, 2017 02:10 IST

राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे संपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यादृष्टीने नाफेडने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. नव्याने अजून सुमारे नऊ लाख क्विंटल तूर खरेदी होईल, असा फेडरेशनचा अंदाज आहे.सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यातील एक लाख टन तूर खरेदीचे आश्वासन राज्य शासनाला दिले. यामुळे संपूर्ण यंत्रणा नवीन योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. याचा अध्यादेश बुधवारपर्यंत जिल्हास्तरावर पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.या वर्षी खरीप हंगामात तूर उत्पादनाच्या खरेदीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्याला जबर फटका बसला. आंदोलनातून सरकारवर दबाव वाढला. यामुळे शासनाला तूर खरेदीसाठी तब्बल तीन योजनांचा आधार घ्यावा लागला. प्रारंभी केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेतून तुरीची खरेदी करण्यात आली. २२ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदी झाली. आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत तूर खरेदी योजनेतून तुरीची खरेदी होणार आहे. यामुळे संपूर्ण खरेदीचा अधिकार मार्केटिंग फेडरेशनलाच राहणार आहे. याच प्रमुख कारणाने इतर एजन्सीची जबाबदारी संपुष्टात येणार आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला आपले मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. तूर खरेदी झाल्यास बारदान्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून बारदाना केंद्राकडे वळता करण्यात आला आहे. व्हीसीएमएसचा पेच सुटणार-विदर्भ को. आॅप. मार्केटिंग फेडरेशनचा मुख्य व्यवसाय खताची विक्री करणे आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांनी तुरीची खरेदी केली. आता खताचा हंगाम असल्याने यात काय करायचे, असा पेच त्यांच्यापुढे होता. नवीन योजनेत केवळ मार्केटिंग फेडरेशनकडेच खरेदी राहणार असल्यामुळे व्हीसीएमएसचा पेच आपसूकच सुटणार आहे.विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि अकोला या चार ठिकाणांवर तुरीच्या पंचनाम्यातील खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. तर यवतमाळच्या काही केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी आहे.कोलकाता, भंडारा आणि धान उत्पादक प्रदेशातूनही बारदाना आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन लाख बारदाना पोहोचला आहे. समोरील खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या नेतृत्वात केली जाणार आहे.- डॉ. अतुल नेरकर,विभागीय पणन अधिकारी, विदर्भ विभाग, नागपूर