शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

केंद्रीय कृषी योजनेतून तूर खरेदी सुरू

By admin | Updated: May 10, 2017 02:10 IST

राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे संपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यादृष्टीने नाफेडने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. नव्याने अजून सुमारे नऊ लाख क्विंटल तूर खरेदी होईल, असा फेडरेशनचा अंदाज आहे.सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यातील एक लाख टन तूर खरेदीचे आश्वासन राज्य शासनाला दिले. यामुळे संपूर्ण यंत्रणा नवीन योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. याचा अध्यादेश बुधवारपर्यंत जिल्हास्तरावर पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.या वर्षी खरीप हंगामात तूर उत्पादनाच्या खरेदीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्याला जबर फटका बसला. आंदोलनातून सरकारवर दबाव वाढला. यामुळे शासनाला तूर खरेदीसाठी तब्बल तीन योजनांचा आधार घ्यावा लागला. प्रारंभी केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेतून तुरीची खरेदी करण्यात आली. २२ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदी झाली. आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत तूर खरेदी योजनेतून तुरीची खरेदी होणार आहे. यामुळे संपूर्ण खरेदीचा अधिकार मार्केटिंग फेडरेशनलाच राहणार आहे. याच प्रमुख कारणाने इतर एजन्सीची जबाबदारी संपुष्टात येणार आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला आपले मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. तूर खरेदी झाल्यास बारदान्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून बारदाना केंद्राकडे वळता करण्यात आला आहे. व्हीसीएमएसचा पेच सुटणार-विदर्भ को. आॅप. मार्केटिंग फेडरेशनचा मुख्य व्यवसाय खताची विक्री करणे आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांनी तुरीची खरेदी केली. आता खताचा हंगाम असल्याने यात काय करायचे, असा पेच त्यांच्यापुढे होता. नवीन योजनेत केवळ मार्केटिंग फेडरेशनकडेच खरेदी राहणार असल्यामुळे व्हीसीएमएसचा पेच आपसूकच सुटणार आहे.विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि अकोला या चार ठिकाणांवर तुरीच्या पंचनाम्यातील खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. तर यवतमाळच्या काही केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी आहे.कोलकाता, भंडारा आणि धान उत्पादक प्रदेशातूनही बारदाना आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन लाख बारदाना पोहोचला आहे. समोरील खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या नेतृत्वात केली जाणार आहे.- डॉ. अतुल नेरकर,विभागीय पणन अधिकारी, विदर्भ विभाग, नागपूर