शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

केंद्रीय कृषी योजनेतून तूर खरेदी सुरू

By admin | Updated: May 10, 2017 02:10 IST

राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे संपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यादृष्टीने नाफेडने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. नव्याने अजून सुमारे नऊ लाख क्विंटल तूर खरेदी होईल, असा फेडरेशनचा अंदाज आहे.सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यातील एक लाख टन तूर खरेदीचे आश्वासन राज्य शासनाला दिले. यामुळे संपूर्ण यंत्रणा नवीन योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. याचा अध्यादेश बुधवारपर्यंत जिल्हास्तरावर पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.या वर्षी खरीप हंगामात तूर उत्पादनाच्या खरेदीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्याला जबर फटका बसला. आंदोलनातून सरकारवर दबाव वाढला. यामुळे शासनाला तूर खरेदीसाठी तब्बल तीन योजनांचा आधार घ्यावा लागला. प्रारंभी केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेतून तुरीची खरेदी करण्यात आली. २२ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदी झाली. आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत तूर खरेदी योजनेतून तुरीची खरेदी होणार आहे. यामुळे संपूर्ण खरेदीचा अधिकार मार्केटिंग फेडरेशनलाच राहणार आहे. याच प्रमुख कारणाने इतर एजन्सीची जबाबदारी संपुष्टात येणार आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला आपले मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. तूर खरेदी झाल्यास बारदान्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून बारदाना केंद्राकडे वळता करण्यात आला आहे. व्हीसीएमएसचा पेच सुटणार-विदर्भ को. आॅप. मार्केटिंग फेडरेशनचा मुख्य व्यवसाय खताची विक्री करणे आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांनी तुरीची खरेदी केली. आता खताचा हंगाम असल्याने यात काय करायचे, असा पेच त्यांच्यापुढे होता. नवीन योजनेत केवळ मार्केटिंग फेडरेशनकडेच खरेदी राहणार असल्यामुळे व्हीसीएमएसचा पेच आपसूकच सुटणार आहे.विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि अकोला या चार ठिकाणांवर तुरीच्या पंचनाम्यातील खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. तर यवतमाळच्या काही केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी आहे.कोलकाता, भंडारा आणि धान उत्पादक प्रदेशातूनही बारदाना आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन लाख बारदाना पोहोचला आहे. समोरील खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या नेतृत्वात केली जाणार आहे.- डॉ. अतुल नेरकर,विभागीय पणन अधिकारी, विदर्भ विभाग, नागपूर